शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महागाईविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:15 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देशेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. भाजप सरकार जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची लूट करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. यात शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी वाढत्या महागाईविरोधात निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन मोर्चा सुरूवात करण्यात आली.महिनाभराच्या कालावधीत पेट्रोल, डिझेलचे दर ८० रुपये लिटरवर पोहोचले, विविध वस्तूंवर कराची आकारणी करुन सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे. रेल्वेमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी भाजप सरकार बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवित आहे. भाजप सरकारचा खरा चेहरा आता पुढे आला असून जनताच या सरकारला धडा शिकविल्या राहणार नाही, असे प्रतिपादन आ.अग्रवाल यांनी केले. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थिती आहे. धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव देण्याची घोषणा भाजपा सरकारने केली होती. मात्र त्याचा सुध्दा या सरकारला विसर पडला आहे.सरकारने शेतकºयांना ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा गाजावाजा केला. मात्र विविध अटी लादून ६० टक्के शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आ.अग्रवाल यांनी केला. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला जी जी आश्वासन दिली होती. त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन अग्रवाल यांनी मोर्चात उपस्थित नागरिकांना केले. काँग्रेस भोला भवन येथून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.उपविभागीय कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करुन विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. वाढत्या महागाईला प्रतिबंध लावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, जीवनाश्यक वस्तूंचे दर आटोक्यात आणा, शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश होता. या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे, माजी जिल्हाध्यक्ष के.आर.शेंडे, शहरध्यक्ष अशोक चौधरी, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस महासचिव सहसराम कोरोटे, नामदेव किरसान, अमर वºहाडे, विनोद जैन, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, नगरसेवक राकेश ठाकूर, जि.प.सभापती विमल नागपूर, पी.जी.कटरे, जि.प.सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सीमा मडावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.