शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:43 IST

कर्ज माफी व पीक कर्ज याबाबत शासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही.

ठळक मुद्देफक्त व्यापाºयांचे सरकार : कटरे व कोरोटे यांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कर्ज माफी व पीक कर्ज याबाबत शासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. त्यासोबतच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी व आपल्या इतर मागण्यांना घेऊन शेतकरी व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या काळात केवळ १२ हजार कोटींची कर्जमाफी केल्याने सर्व शेतकºयांना त्याचा फायदा झाला. त्यावेळी कोणतेही निकष थोपले गेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री लाखो रुपयांची जाहिरात करून ३६ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचे ढोल वाजवित आहेत. यात कर्जमाफी व पिक विम्यासाठी आॅनलाईनची अट घातली आहे. १०० किमी. अंतरावरुन तालुकास्थळी येणाºया शेतकºयांना नेटचे सर्वर बंद असल्याने आल्यापावली परत जावे लागत आहे. पीक विम्याचेही तेच हाल आहे. शासनाजवळ सर्व कर्जाची आकडेवारी असतानाही नाटके कशासाठी? असा सवाल उपस्थित करून या गोष्टी सर्वसामान्य व शेतकरी वर्गाने समजून घ्याव्या. ही राज्य व केंद्राची सरकार सर्वसामान्य व शेतकºयांची नाही तर लबाडांची आहे, असे ते शेतकरी टॅÑक्टर मोर्चात म्हणाले.मोर्चात उपस्थित शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी, सन २०१५-१६ चा दुष्काळ निधी, धानाला तीन हजार रुपये बोनस, सर्वांच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये मिळाले का, असे प्रश्न विचारले. यावर सर्वांनी ‘नाही’ अशी सामूहिक घोषणा केली.यानंतर कोरोटे पुढे म्हणाले, असे मोठेमोठे वादे करून, खोटे बोलून सत्ता मिळविली. मात्र सत्ता मिळताच शेतकरी व सर्वसामान्य लोकांना वाºयावर सोडले. आता पावसानेसुद्धा दगा दिल्याने विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया आहे. अशा परिस्थितीत सरकार कर्जमाफी दिल्याचा प्रचार करीत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात अजूनपर्यंत एक दमडीसुद्धा दिली नाही. या सरकारला शेतकरी व सर्वसामान्य लोकांशी काहीही देणे-घेणे नाही. हे फक्त व्यापाºयांचे सरकार आहे आणि गोड बोलून सत्ता मिळविणाºया दगाबाजांचे सरकार आहे. तरी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सत्ता काबीज करणाºयांना धडा शिकविण्यासाठी वेळ आली आहे, असे ते म्हणाले.मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांना देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार बी.टी. यावलकर यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने ३० आॅगस्टपर्यंत हे क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करा, सन २०१५-१६ मध्ये दुष्काळ घोषित गावातील शेतकºयांना त्वरित मोबदला द्या, शेतकºयांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्या, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे.याप्रसंगी मोर्चात गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार रामरतन राऊत, लोकसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन मिसपिरीचे उपसरपंच जीवनलाल सलामे यांनी केले. आभार तालुका महामंत्री बळीराम कोटवार यांनी मानले.मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी पुढाकार घेतला. जि.प. सदस्य दिपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, उपसभापती संगीता भेलावे, ओमराज बहेकार, माणिक आचले, कैलास घासले, रमेश नागदेवे, छन्नुलाल उईके, छगनलाल मुंगनकर, बळीराम कोटवार, संदीप भाटीया, जीवन सलामे, सोनू नेताम, राजाराम सलामे, चैतराम पटले, राजू झिंगरे व सुरेंद्र बन्सोड यांच्यासोबत संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष भेटून राज्य व केंद्र सरकाराचे ध्येयधोरण याविषयी माहिती देवून लोकांना जागृत केले आणि ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येने लोकांना येण्यास परावृत्त केले.