शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त आणि वनविभाग यांच्यातील संघर्ष पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:43 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते.

ठळक मुद्देश्रीरामपूरवासीयांचे आंदोलन सुरू : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते. मात्र प्रशासन आणि शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. परिणामी श्रीरामपूर येथील व पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारी (दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या गावाकडे कूच केली. त्यांचे आंदोलन मंगळवारी (दि.२६) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.दरम्यान गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता वनविभागाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जंगलात जाण्याच्या प्रवेशद्वारावर ताराचे कुंपण करण्यात आले. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे शंभरावर कर्मचारी तैनात करण्यात आले. त्या प्रकल्पग्रस्तांना जंगलात जाण्याला मज्जाव करण्यात आला.त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सुमारास तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रकल्पग्रस्तांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता तिथेच बस्तान मांडले. वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून आधी मागण्यांची पूर्तता करा अन्यथा येथून हलणार नाही असा पावित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारी तीन वाजताच्या सुमारास गोंदियाचे उपवनसंरक्षक युवराज यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु, आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही आंदोलन करणार नसल्याचे सांगताच उपवन संरक्षकांनी देखील त्या मागण्या पूर्ण करणे आपल्या हातात नसल्याचे प्रकल्पग्रस्तांना सांगीतले.त्यामुळे उपवनसंरक्षकांना देखील हतबल झाल्याने ही चर्चा विफल ठरली. कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे सायंकाळपर्यंत प्रकल्पग्रस्त नागरीक ठाण मांडून जंगलात बसले होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी (दि.२६) दुसºया दिवशी सुध्दा प्रकल्पग्रस्त आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते.आंदोलनस्थळीच मुक्कामश्रीरामपूर येथील व पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारी (दि.२५) आपल्या गावाकडे कूच केली.जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका घेतली. तसेच रात्रभर आंदोलन स्थळीच मुक्काम ठोकला. मंगळवारी दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळीच स्वंयपाक केला.मुलाबाळांसह ६०० नागरिकांचा समावेशश्रीरामपूर येथील महिला आणि पुरूषांनी आपल्या लहानग्या बाळांना घेवून आपल्या जंगलात असलेल्या गावाकडे निघाले होते.दिवसभर लहान मुले भूक आणि तहानेने व्याकूळ झाले होते. मात्र निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने रस्ता अडवून धरला. मात्र लहान मुलांकरिता साध्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.गुन्हे दाखल करण्याची धमकीश्रीरामपूरवासीयांनी टोकाची भूमिका घेत आंदोलन सुरू केले. तर निवडणुका सुध्दा तोंडावर आहेत. त्यामुळे प्रशासन आणि शासनाला सुध्दा चांगलाच घाम फुटला.आंदोलन दडपण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना गप्प रहा अन्यथा खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची धमकी वनविभागाचे अधिकारी देत असल्याचा आरोप श्रीरामपूर येथील गावकºयांनी केला आहे. सोमवारी (दि.२५) आपण आपल्या मूळ गावी परतणार असल्याचा ईशारा श्रीरामपूर येथील नागरिकांनी दिला होता. यातून प्रशासनाची नाचक्की होणार असल्याचे लक्षात येताच वनविभागाने पोलिसांचा बंदोबस्त लावला. सुमारे तीनशे पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. गावात जाण्याच्या मार्गावर तारांचे कुंपन टाकून त्यांची वाट अडविण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.१२ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूलसडक अर्जुनी तालुक्यातील कालीमाती, झनकारगोंदी, कवलेवाडा या जंगलव्याप्त गावाचे पुर्वसन श्रीरामपूर येथे करण्यात आले. मात्र त्याठिकाणी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. मागील १२ वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी हे आंदोलनाचे पाऊल उचलले.