शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अवकाळीने वाढविली शेतकऱ्यांसह फेडरेशनची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे रबीतील कापणी केलेल्या धानाची चिंता, तर फेडरेशनला ...

गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे रबीतील कापणी केलेल्या धानाची चिंता, तर फेडरेशनला खरिपातील विविध केंद्रांवर उघड्यावर असलेल्या १ लाख क्विंटल धानाची चिंता सतावीत आहे. खरिपातील धानाची उचल युद्धपातळीवर होईपर्यंत रबीतील खरेदी सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी या विभागाने गोदामांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३४ लाख क्विंटल धान खरेदी केली होती; पण धानाची गुणवत्ता, भरडाईदरम्यान येणारी तूृट यामुळे राइस मिलर्सने धानाची उचल केली नव्हती. तीन प्रशासनाने केवळ तीन महिने चर्चेत काढले. तोपर्यंत रबीतील धान खरेदीची वेळ येऊन ठेपली, तर यंदा रबीत सर्वाधिक ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज आहे. मात्र, खरिपातील धानाची उचल न झाल्याने गोदाम हाऊसफुल आहेत, तर मोठे खासगी गोदाम भाड्याने घेऊन यावर तोडगा काढण्याची जिल्हा प्रशासनाची अद्यापही मानसिकता आहे. मात्र, या सर्वांत भरडला जात आहे तो शेतकरी. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे. त्यातच रबीतील धानाची विक्री झाली नसल्याने खरिपासाठी खते, बियाणे याची खरेदी आणि मशागतीची कामे कशी करावीत याच विवंचनेत सध्या बळीराजा आहे. मात्र, जिल्हा प्रशासन केवळ लवकरच केंद्र सुरू करू यापलीकडे काहीच करीत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश संस्थांना दिले असले तरी गोदामात धान असल्याने खरेदी करणार तरी कशी, असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

..........

खासगी गोदाम भाड्याने घेण्यासाठी कुणाची प्रतीक्षा

रबीतील धान खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी गोदाम भाड्याने घेण्याची गरज आहे; पण यासाठी नेमकी कुणाची प्रतीक्षा केली जात आहे हे कळण्यास अद्यापही मार्ग नाही. मात्र, या सर्व गोंधळात रबीची खरेदी खरिपात करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, असे झाल्यास अर्ध्याहून अधिक शेतकरी खासगी शेतकऱ्यांना धानाची विक्री करून मोकळे झाले असतील, हे मात्र निश्चित आहे.

सूचना : यावर तोडगा काढण्याची जिल्हा प्रशासनाची अद्यापही मानसिकता ----आहे. की नाही पाहिजे ते घ