शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

प्राथमिक शाळांमधील संगणक धूळ खात

By admin | Updated: December 2, 2014 23:09 IST

महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून संगणकाचे महत्व ओळखून वर्ग पहिली ते सातवीकरिता शाळेत संगणक उपलब्ध करून दिले. परंतु हे संगणक अनेक

सालेकसा : महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून संगणकाचे महत्व ओळखून वर्ग पहिली ते सातवीकरिता शाळेत संगणक उपलब्ध करून दिले. परंतु हे संगणक अनेक शाळांत धूळखात असून आदिवासी नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. वर्ग पहिली ते सातवीसाठी माहिती संप्रेक्षण तत्वज्ञान हा अनिवार्य विषय म्हणून अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आलेला आहे. संगणक विषयात फक्त संगणकाचा अभ्यासच नव्हे तर संगणक प्रगतीचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना संगणक व तंत्रज्ञानाच्या वापरात पारंगत होणे आवश्यक आहे. यात इंटरनेटसह अनेक अप्लीकेशन अशा अनेक बाबींचा समावेश आहे. त्या सर्व बाबींचा सराव करण्यासाठी संगणकांना व इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे. पण अनेक शाळेत संगणक शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी संगणकाच्या ज्ञाणाला मुकत आहेत.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. विद्युत बिले जास्त आल्यामुळे वीज मीटर काढण्यात आले आहे. संगणकांसाठी विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे संगणक धूळखात राहण्याची पाळी शाळेत आलेली आहे. संगणक प्रयोगशाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम शाळेत अद्याप झालेले नाही. आदिवासी नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आरटीई (राईट टू एज्युकेशन) २००९ अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना सुखसुविधा पुरविणे आवश्यक आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाव्दारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हे उद्दिष्ट्य ठेवले आहे. असे असतानाही संगणक शिक्षणासाठी शिक्षक नाही. विद्युत बिल भरण्यासाठी शाळेकडे रुपये नाही, अशी अवस्था आहे.गावच्या शाळेत मूल्यांकनातसुध्दा संगणकावर गुण देण्यात आलेले आहेत. तरी विद्यार्थ्यांना संगणकाचा उपयोग न होता ते धूळखात पडलेले असून याला जबाबदार कोण? शिक्षण विभाग की शाळा, असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)