शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

संगणकीकृत धान्य वाटपात सालेकसा जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:41 IST

२५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते.

ठळक मुद्देपुरवठा विभाग : ९८.८ टक्के शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : २५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते. मात्र स्वस्त धान्य दुकानात पार्इंट आॅफ सेल (पीओएस) संगणीकृत प्रणालीव्दारे शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप सुरू झाल्याने आदिवासीबांधवाना सुध्दा नियमित धान्य मिळत आहे. संगणीकृत पध्दतीने धान्य वाटप करण्यात हा तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे.सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली आता संगणीकृत झाल्याने स्वस्त धान्य दुकानात सार्वजनिक वितरण प्रणालीत होणाऱ्या भ्रष्टाचार सुध्दा काही प्रमाणात कमी झाला आहे. संगणीकृत पीओएस प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब आदिवासी कुटूंबाला हक्काचे पोटभर जेवण उपलब्ध होत आहे. पीओएसच्या माध्यमाने धान्य वाटप करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.आदिवासी, डोंगराळ भागात असलेल्या सालेकसा तालुक्यात वेळोवेळी इंटरनेटची समस्या निर्माण होत होती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने यावर सुध्दा मात करुन पीओएस प्रणालीची ९८.९ टक्के अंमलबजावणी केली.ही धान्य वाटप प्रणाली २०१७ पासून सुरु करण्यात आली. या अंतर्गत सालेकसा तालुक्यातील शंभर रेशन दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील ९८.९ टक्के शिधापत्रिकाधारकांना नियमित व पुरेपूर धान्य वाटप होत आहे.१६ हजार शिधापत्रिकाधारकतालुक्यातील एकूण शिधापत्रिकांधारकांची संख्या १६ हजार २६४ असून त्यांना एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांसह एकूण १०३ ठिकाणी केरोसीन विक्री करणारे आहेत.शासनामार्फत मिळणाºया अनुदान सोयी सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे या हेतुने संगणीकृत धान्य वाटप प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यामुळे गरीब, आदिवासी व गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे अन्न धान्य मिळण्यास मदत होत आहे.- सी.आर.भंडारी, तहसीलदार, सालेकसास्वस्त दुकानातून मिळणारे धान्य दर महिन्याला नियमित मिळत असून माझ्या कार्डावरील धान्य मलाच मिळते. त्यामुळे शासनाने सुरु केलेली संगणीकृत धान्य वाटप पध्दती सर्व सामान्य गरीब लोकांसाठी हिताची ठरत आहे.- आनंदराव पंधरे, शिधापत्रिकाधारक, पोवारीटोला.