शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आहे आनंद खरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या (मुंबई) आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे ...

सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या (मुंबई) आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच खरा आनंद असल्याने नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित असलेली सर्व दिवाणी स्वरूपाची प्रकरणे जसे वाटपाचा दावा, रस्त्याचा दावा, कब्जा व मालकी हक्काचा दावा, मनाई हुकुमाचा दावा, अतिक्रमणाचा दावा, शेतजमिनीचा दिवाणी वाद तसेच सर्व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५अंतर्गत येणारे अर्ज, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये दाखल प्रकरण, उदरनिर्वाह भत्ता अर्ज, तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे आपापसांत तडजोड करून निकाली काढावीत. याकरिता तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे न्या. आव्हाड यांनी कळविले आहे.