शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच आहे आनंद खरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या (मुंबई) आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे ...

सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या (मुंबई) आदेशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालयात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भांडणापेक्षा समझोता बरा, त्यातच खरा आनंद असल्याने नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित असलेली सर्व दिवाणी स्वरूपाची प्रकरणे जसे वाटपाचा दावा, रस्त्याचा दावा, कब्जा व मालकी हक्काचा दावा, मनाई हुकुमाचा दावा, अतिक्रमणाचा दावा, शेतजमिनीचा दिवाणी वाद तसेच सर्व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५अंतर्गत येणारे अर्ज, परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये दाखल प्रकरण, उदरनिर्वाह भत्ता अर्ज, तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे आपापसांत तडजोड करून निकाली काढावीत. याकरिता तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे न्या. आव्हाड यांनी कळविले आहे.