शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

गावातील तक्रारी जाऊ लागल्या ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

केशोरी : सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठीत करुन गावातील वाद लोकसहभागातून गावातच मिटवून ...

केशोरी : सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठीत करुन गावातील वाद लोकसहभागातून गावातच मिटवून सामाजिक सलोखा व सुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. परंतु अलीकडच्या काळात तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावले असून गावातील लहान-सहान तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागल्या आहेत.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात सन २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठित करण्यात आल्या. तेव्हा या समित्यांचे कार्यही वाखाणण्याजोगे होते. समित्यांच्या कार्याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. समाज हितासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम सध्या कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ वर्षापासून तंटामुक्त गाव समित्यांचे मूल्यमापन करण्याचे काम बंद झाल्याने तंटामुक्त समित्यांकडून पूर्वीसारखे काम होताना दिसत नाही. कारण गावातील तंटे आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागले आहेत. दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांचा आढावा घेऊन ज्या समित्यांचे काम चांगले होते त्यांना प्रशासनाकडून पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जात होते. मात्र मागील ४ वर्षापासून तंटामुक्त समितीच्या कार्याचे मूल्यमापन होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.