शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

गावातील तक्रारी जाऊ लागल्या ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

केशोरी : सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठीत करुन गावातील वाद लोकसहभागातून गावातच मिटवून ...

केशोरी : सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठीत करुन गावातील वाद लोकसहभागातून गावातच मिटवून सामाजिक सलोखा व सुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. परंतु अलीकडच्या काळात तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावले असून गावातील लहान-सहान तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागल्या आहेत.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात सन २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठित करण्यात आल्या. तेव्हा या समित्यांचे कार्यही वाखाणण्याजोगे होते. समित्यांच्या कार्याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. समाज हितासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम सध्या कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ वर्षापासून तंटामुक्त गाव समित्यांचे मूल्यमापन करण्याचे काम बंद झाल्याने तंटामुक्त समित्यांकडून पूर्वीसारखे काम होताना दिसत नाही. कारण गावातील तंटे आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागले आहेत. दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांचा आढावा घेऊन ज्या समित्यांचे काम चांगले होते त्यांना प्रशासनाकडून पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जात होते. मात्र मागील ४ वर्षापासून तंटामुक्त समितीच्या कार्याचे मूल्यमापन होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.