शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

प्रत्येक शाळेत लागणार तक्रारपेटी

By admin | Updated: May 8, 2017 00:50 IST

अध्यापन तसेच शिक्षणासंबंधी विविध समस्या व अडचणी असून सुध्दा विद्यार्थी व पालक प्रखरपणे बोलू शकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : अध्यापन तसेच शिक्षणासंबंधी विविध समस्या व अडचणी असून सुध्दा विद्यार्थी व पालक प्रखरपणे बोलू शकत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांच्या समस्या सुटत नाही. अशात अनेकवेळा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत असते. या बाबी लक्षात घेता राज्य शासनाने प्रत्येक शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी तक्रारपेटी लावण्याचा निर्णय नुकताच घेतला असून शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक शाळांना आदेश निर्गमीत केले आहे. या आदेशान्वये प्रत्येक शाळेने आपल्या दर्शनीयस्थळी तक्रार पेटी लावणे बंधनकारक राहील. शासनाचा हा निर्णय सर्व प्रकारच्या शाळांना अंमलात आणावा लागेल यात शासकीय निमशासकीय शाळा, जि.प.शाळा, नगर परिषद शाळा खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, मराठी शाळा, इंग्रजी शाळा, कान्व्हेंट शाळा, स्वयं अर्थसहाय शाळा आश्रम शाळा, व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या शाळा तसेच महाविद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात सुध्दा अशा तक्रारपेट्या लावण्यात येतील. तक्रारपेटीमध्ये विद्यार्थी आपल्या शैक्षणिक समस्या, शाळेत मिळणाऱ्या भौतिक सुविधांबद्दल असलेल्या समस्या लिहून टाकतील. त्याचबरोबर पालकवर्गही ज्या बाबतीत असमाधानी असेल त्या समस्या लिहून टाकतील. सदर तक्रारपेटी आठवडा भर पालक व विद्यार्थी दोन्हीसाठी खुली राहणार असून आठवड्याच्या शेवटी उघडण्यात येईल व त्यातील तक्रारींची नोंद घेण्यात येईल. तक्रारपेटीत असलेल्या समस्यांचे निराकरण करणे शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक राहील. तक्रारपेटी उघडताना तक्रारीची योग्य दखल घ्यावी यासाठी त्यावेळी शाळा समितीचे पदाधिकारी, पालक तसेच अधिकारी सुद्धा उपस्थित राहू शकतील. ज्या शाळांमध्ये तक्रारीची दखल घेतली जाणार नाही त्या शाळांची तक्रार शिक्षण विभागाकडे केली जाईल.