शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

बाराभाटी : या परिसरातील जंगलाला लागून असलेल्या शेतातील मका, चना, उडद अशा कडधान्याची रानडुकरांनी खूपच नासधूस केली आहे. यामुळे ...

बाराभाटी : या परिसरातील जंगलाला लागून असलेल्या शेतातील मका, चना, उडद अशा कडधान्याची रानडुकरांनी खूपच नासधूस केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यात आला. परंतु अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

ग्राम कवठा, बोळदे व डोंगरगाव या भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. जंगलालगत शेती असल्याने हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. मात्र यामुळे शेतकरी चांगलेच संकटात येतात. यंदाही तोच प्रकार घडला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात कागदपत्र जमवून फाईल प्रादेशिक वन परिक्षेत्राधिकारी (नवेगावबांध) यांच्या कार्यालयात सादर केली आहे. पण अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. कोरोनामुळे नागरिकांच्या हाताला काम नाही. अशात उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. तरी नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी बाराभाटी, येरंडी-देवलगाव, डोंगरगाव, बोळदे, कवठा, कुंभीटोला व ब्राह्मणटोला या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

---------------------------

कोरोनामुळे निधी अप्राप्त आहे. निधी मिळताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केला जाईल.

- रोशन दोनोडे,

वन परिक्षेत्राधिकारी, वन विभाग

नवेगावबांध