शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने आणखी संकटात पडला आहे. दोन ...

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने आणखी संकटात पडला आहे. दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे अर्जुनी-मोरगावसह तालुक्यातील केशोरी भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व स्थानिक पातळीवर पंचनामे करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्राद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यातच (दि.३) सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या अवकाळी वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर काही झाडांना या वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस हा आता नित्याचाच झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या शेवटच्या सत्रात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. त्यातच आता रब्बी हंगामातील धान पीक कापणीसाठी तयार आहेत. अशात पुन्हा मागील ३ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच (दि.४) तालुक्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वादळवाऱ्याने धान पिकाला फटका बसला आहे. तर या वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकालाही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत अवकाळी पावसाने हाती आलेले पीक पुन्हा धोक्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. उभ्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर या निसर्गाच्या अनियमिततेमुळे आली आहे. यात स्वत:च लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री बडोले यांनी केली आहे. या बाबतचे पत्र पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठविले आहे.