शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने आणखी संकटात पडला आहे. दोन ...

अर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अवकाळी पावसाने आणखी संकटात पडला आहे. दोन दिवस आलेल्या अवकाळी पावसामुळे अर्जुनी-मोरगावसह तालुक्यातील केशोरी भागातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी व स्थानिक पातळीवर पंचनामे करून त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्राद्वारे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यातच (दि.३) सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या अवकाळी वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तर काही झाडांना या वादळवाऱ्याचा फटका बसला आहे. तालुक्यात अवकाळी पाऊस हा आता नित्याचाच झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या शेवटच्या सत्रात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली. त्यातच आता रब्बी हंगामातील धान पीक कापणीसाठी तयार आहेत. अशात पुन्हा मागील ३ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच (दि.४) तालुक्यात अनेक भागात वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वादळवाऱ्याने धान पिकाला फटका बसला आहे. तर या वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकालाही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत अवकाळी पावसाने हाती आलेले पीक पुन्हा धोक्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. उभ्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर या निसर्गाच्या अनियमिततेमुळे आली आहे. यात स्वत:च लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री बडोले यांनी केली आहे. या बाबतचे पत्र पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पाठविले आहे.