शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून लाटतात कमिशन

By admin | Updated: September 2, 2016 01:39 IST

शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक मालामाल : एजन्सीसह कर्मचाऱ्यांचाही सहभागआमगाव : शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत तेथे महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात तांदूळ व डाळ शिल्लक राहतो. तिच्यावर संबंधित कर्मचारी व एजंसी डल्ला मारताना दिसत आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रकार सुरू आहे.गाडीत आलेला व उरलेला पोषण आहार, वाटप करणारी एजंसीच विक्री करते. यात एजंसी, मुख्याध्यापक तथा जबाबदारी असणारे शिक्षक आणि केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी तसेच आणखीही काही अधिकारी सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे. या सर्वांना शालेय पोषण आहारात किती गोलमाल आहे याची संपूर्ण माहिती असते. मात्र धनिरामच्या लालचेपोटी कोणी यात काय गौडबंगाल आहे यावर भाष्य करीत नाही. ही परंपरा सर्वच शाळेत सुरू आहे. जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करुन वाटपानंतर व उपयोगात पोषण आहार आल्यानंतर किती साठा शाळेत उपलब्ध आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे.नियमानुसार एका विद्यार्थ्यांमागे एका दिवसाला किती तांदुळ, दाळ, तेल व इतर सामान देणे आहे हा ठरविलेला कार्यक्रम आहे. प्रत्यक्षात नियमाने शालेय पोषण आहार शिजविला जात नाही. काही विद्यार्थी पोषण आहार घेत नाही. काहीची अनुपस्थिती असते व प्रमाणात पोषण आहार शिजविला जात नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. शिल्लक पोषण आहारावरच सर्वाचा डोळा असतो. काही शाळेत पोषण आहारावरुन शिक्षक व मुख्याध्यापक यांचे भांडण झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. खाजगी शाळेत मुख्याध्यापक हाच सर्वेसर्वा असल्याने तो कोणाला विकतो, कसा खातो हे काही कर्मचाऱ्यांना माहित असूनही ते बोलत नाही. मात्र केंद्रप्रमुख याचा शालेय पोषण आहाराचा महिना मुख्याध्यापकाकडून किती घ्यायचा हा ठरलेला असतो. याच उरलेल्या पोषण आहारावर अनेक मालामाल झाले. तसेच वाटप करणाऱ्या एजंसीचे वारेनारे झाले. ही वाटप पद्धती बदलविणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)