शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून लाटतात कमिशन

By admin | Updated: September 2, 2016 01:39 IST

शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक मालामाल : एजन्सीसह कर्मचाऱ्यांचाही सहभागआमगाव : शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत तेथे महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात तांदूळ व डाळ शिल्लक राहतो. तिच्यावर संबंधित कर्मचारी व एजंसी डल्ला मारताना दिसत आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रकार सुरू आहे.गाडीत आलेला व उरलेला पोषण आहार, वाटप करणारी एजंसीच विक्री करते. यात एजंसी, मुख्याध्यापक तथा जबाबदारी असणारे शिक्षक आणि केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी तसेच आणखीही काही अधिकारी सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे. या सर्वांना शालेय पोषण आहारात किती गोलमाल आहे याची संपूर्ण माहिती असते. मात्र धनिरामच्या लालचेपोटी कोणी यात काय गौडबंगाल आहे यावर भाष्य करीत नाही. ही परंपरा सर्वच शाळेत सुरू आहे. जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करुन वाटपानंतर व उपयोगात पोषण आहार आल्यानंतर किती साठा शाळेत उपलब्ध आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे.नियमानुसार एका विद्यार्थ्यांमागे एका दिवसाला किती तांदुळ, दाळ, तेल व इतर सामान देणे आहे हा ठरविलेला कार्यक्रम आहे. प्रत्यक्षात नियमाने शालेय पोषण आहार शिजविला जात नाही. काही विद्यार्थी पोषण आहार घेत नाही. काहीची अनुपस्थिती असते व प्रमाणात पोषण आहार शिजविला जात नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. शिल्लक पोषण आहारावरच सर्वाचा डोळा असतो. काही शाळेत पोषण आहारावरुन शिक्षक व मुख्याध्यापक यांचे भांडण झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. खाजगी शाळेत मुख्याध्यापक हाच सर्वेसर्वा असल्याने तो कोणाला विकतो, कसा खातो हे काही कर्मचाऱ्यांना माहित असूनही ते बोलत नाही. मात्र केंद्रप्रमुख याचा शालेय पोषण आहाराचा महिना मुख्याध्यापकाकडून किती घ्यायचा हा ठरलेला असतो. याच उरलेल्या पोषण आहारावर अनेक मालामाल झाले. तसेच वाटप करणाऱ्या एजंसीचे वारेनारे झाले. ही वाटप पद्धती बदलविणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)