शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दिलासादायक। १५८० रूग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यातील कोविड योद्धा । १६ तारखेला सर्वाधिक ३८५ रूग्ण ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी टेंशन वाढविणारा ठरल्याचे दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २६३६ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. शिवाय तब्बल ३६ रूग्णांचा जीवही याच महिन्यात गेला आहे. असे असतानाही याच महिन्यात १५८० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्धांच्या माध्यमातून एक दिलासादायक आकडेवारीही याच महिन्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे. असे असतानाही रूग्ण संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या रूग्ण संख्येत ५० टक्के पेक्षा जास्त रूग्ण व मृतांचा आकडा हा फक्त सप्टेंबर महिन्यातील आहे.सप्टेंबर महिन्यातील ही आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत (दि.१८) जिल्ह्यात तब्बल २६३६ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत. तर सोबतच ३६ रूग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. यामुळे सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरला आहे. असे असतानाच मात्र सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत तब्बल १५८० रूग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. यामुळे रूग्णांच्या आकडेवारीत वाढ असल्याने टेंशन वाढविणारा सप्टेंबर महिना तेवढ्यात प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या कोरोना योद्धांमुळे दिलासादायक ही ठरला आहे.मास्क करणार आपली सुरक्षाकोरोनाच्या या लढाईत शारीरिक अंतर व मास्कचा नियमित वापर हे २ शस्त्र माणसाच्या हाती आहेत. त्यातही मास्कमुळे आजघडीला आपण सर्वाधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर्सही सांगत आहेत. त्यामुळे हा माझा मित्र, हा माझा सहकारी, हा माझा नातेवाईक या गोष्टी बाजूला सारून कुणाच्याही संपर्कात येण्यापूर्वी मास्क लावण्याची गरज आहे.घरीच राहण्याची गरजसध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. या जनता कर्फ्यूला बाजारात चांगला प्रतिसाद असतानाच शहरातील अन्य भागांत मात्र प्रतिसाद दिसून येत नाही. मात्र नागरिकांनी घरीच राहून स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. शहरातील प्रत्येकच भागात कोरोना रूग्ण निघून येत असल्याने अधिकच सावधान राहण्याची आता खरी गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या