शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक। १५८० रूग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यातील कोविड योद्धा । १६ तारखेला सर्वाधिक ३८५ रूग्ण ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी टेंशन वाढविणारा ठरल्याचे दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २६३६ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. शिवाय तब्बल ३६ रूग्णांचा जीवही याच महिन्यात गेला आहे. असे असतानाही याच महिन्यात १५८० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्धांच्या माध्यमातून एक दिलासादायक आकडेवारीही याच महिन्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे. असे असतानाही रूग्ण संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या रूग्ण संख्येत ५० टक्के पेक्षा जास्त रूग्ण व मृतांचा आकडा हा फक्त सप्टेंबर महिन्यातील आहे.सप्टेंबर महिन्यातील ही आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत (दि.१८) जिल्ह्यात तब्बल २६३६ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत. तर सोबतच ३६ रूग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. यामुळे सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरला आहे. असे असतानाच मात्र सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत तब्बल १५८० रूग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. यामुळे रूग्णांच्या आकडेवारीत वाढ असल्याने टेंशन वाढविणारा सप्टेंबर महिना तेवढ्यात प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या कोरोना योद्धांमुळे दिलासादायक ही ठरला आहे.मास्क करणार आपली सुरक्षाकोरोनाच्या या लढाईत शारीरिक अंतर व मास्कचा नियमित वापर हे २ शस्त्र माणसाच्या हाती आहेत. त्यातही मास्कमुळे आजघडीला आपण सर्वाधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर्सही सांगत आहेत. त्यामुळे हा माझा मित्र, हा माझा सहकारी, हा माझा नातेवाईक या गोष्टी बाजूला सारून कुणाच्याही संपर्कात येण्यापूर्वी मास्क लावण्याची गरज आहे.घरीच राहण्याची गरजसध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. या जनता कर्फ्यूला बाजारात चांगला प्रतिसाद असतानाच शहरातील अन्य भागांत मात्र प्रतिसाद दिसून येत नाही. मात्र नागरिकांनी घरीच राहून स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. शहरातील प्रत्येकच भागात कोरोना रूग्ण निघून येत असल्याने अधिकच सावधान राहण्याची आता खरी गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या