शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

दिलासा : पाच महिन्यात प्रथमच शून्य बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

जून महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने डाउन होत गेला, तर तिरोडा, देवरी आणि सडक अर्जुनी हे तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. गोंदिया तालुकावगळता इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ असून, हे तालुकेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

ठळक मुद्देचार बाधितांनी केली मात : कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात पूर्णपणे ओसरली आहे, तर रुग्णसंख्येतसुद्धा झपाट्याने घट होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३वर आली आहे, तर २८ जानेवारीनंतर रविवारी (दि.३) प्रथमच शून्य कोरोनाबाधितांची नोंद झाली. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.जून महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने डाउन होत गेला, तर तिरोडा, देवरी आणि सडक अर्जुनी हे तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. गोंदिया तालुकावगळता इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २ ते ३ असून, हे तालुकेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी एकूण ७८९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ७०८ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ७९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १,९९,५०० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७४,२४५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २,१८,६२६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९,७५,५५३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१५२ कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ४०,४०९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस- कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील राज्यापेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. गोंदिया जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९८.१९ टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी रेट हा ९६ टक्के आहे. कोरोनाबाधितांचा मृत्युदरसुद्धा स्थिर आहे. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या