शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कर्तव्यासाठी पुढे या (झेंडा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. असिम त्याग, साहस, कर्तव्याची पूर्ती यामुळे आज ...

गोंदिया : स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. असिम त्याग, साहस, कर्तव्याची पूर्ती यामुळे आज आपण स्वांतत्र्यांची ७४ वर्षे पूर्ण केली असून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारतीय संविधानाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रत्येकाला अधिकार बहाल केले आहेत. सध्याच्या काळात देशासह जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले असून अनेक घटक आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. देशाला संकटातून पुढे नेण्यासाठी अधिकाराबरोबरच कर्तव्यांची पूर्ती करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले.

येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

पुढे बोलताना त्यांनी, कोविड काळात महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आपला परिसर हा ग्रामीण भागातील असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना जोडणे कठीण कार्य होते. परंतु नमाद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या कार्यात महाविद्यालय यशस्वी झाले. विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांना विद्यार्थी अनुपस्थित राहू नयेत, यासाठी महाविद्यालयाने विशेष परिश्रम घेतल्याचेही सांगितले.

यावेळी एनएसएसचे प्रा. बबन मेश्राम यांचा उल्लेखनीय कार्यासाठी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.