शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कर्तव्यासाठी पुढे या (झेंडा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. असिम त्याग, साहस, कर्तव्याची पूर्ती यामुळे आज ...

गोंदिया : स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. असिम त्याग, साहस, कर्तव्याची पूर्ती यामुळे आज आपण स्वांतत्र्यांची ७४ वर्षे पूर्ण केली असून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारतीय संविधानाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रत्येकाला अधिकार बहाल केले आहेत. सध्याच्या काळात देशासह जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले असून अनेक घटक आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. देशाला संकटातून पुढे नेण्यासाठी अधिकाराबरोबरच कर्तव्यांची पूर्ती करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले.

येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

पुढे बोलताना त्यांनी, कोविड काळात महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आपला परिसर हा ग्रामीण भागातील असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना जोडणे कठीण कार्य होते. परंतु नमाद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या कार्यात महाविद्यालय यशस्वी झाले. विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांना विद्यार्थी अनुपस्थित राहू नयेत, यासाठी महाविद्यालयाने विशेष परिश्रम घेतल्याचेही सांगितले.

यावेळी एनएसएसचे प्रा. बबन मेश्राम यांचा उल्लेखनीय कार्यासाठी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.