शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करा

By admin | Updated: April 15, 2016 02:23 IST

मागील चार-पाच वर्षांपासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना अस्तव्यस्त स्थितीत ठप्प पडली असून ..

रजेगाव-काटी सिंचन योजना : किसान संघर्ष समितीची मागणीरावणवाडी : मागील चार-पाच वर्षांपासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना अस्तव्यस्त स्थितीत ठप्प पडली असून आजतागायत अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करण्यात आली नाही. संबंधित विभागाने या अधिग्रहित भूमिची संयुक्त मोजणी करावी, अशी मागणी किसान संघर्ष समितीने केली आहे.परिसरात शेतीच्या सिंचनासाठी सोय उपलब्ध करून हरितक्रांती निर्माण होणार, असे स्वप्न तत्कालीन सरकारने दाखविले. या हेतूने सन २००७ पासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेकरिता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी स्वयंनिर्णयाने बळकावण्यात आल्या. शासनाने सारे कायदे धाब्यावर बसवून भूमिअधिग्रहण केले. योजनेवर शासनाच्या कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. सर्वसाधारणपणे भूसंपादन कायद्याखाली खासगी जमीन संपादनाची कार्यवाही करताना संपादित करण्यात येणारी जमीन नेमकी कुणाची, किती व कोणती? हेच निश्चित नाही. हे निश्चित करण्यासाठी कायद्याच्या कलम ६ खालील जाहीरनामा प्रसिद्ध होण्यापूर्वी संपादित करावयाच्या जमिनीची संयुक्त मोजणी करणे आवश्यक आहे. यामागील उद्देश्य म्हणजे भविष्यात कोणताही तंटा उद्भवू नये. म्हणून संबंधित जमीनमालक व इतर संबंधित व्यक्ती, संपादन संस्थेचे प्रतिनिधी, भूमी अभिलेख, कृषी विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थितीत अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप संयुक्त मोजणी केलीच नसून साधी मोजणीसुद्धा आजतागायत करण्यात आली नाही. सदर योजना एकच असून अधिग्रहित जमिनीचा मोबदला दोन प्रकारे काढण्यात आलेला आहे. एका शेतकऱ्याला अत्यल्प मोबदला तर दुसऱ्या शेतकऱ्याला अवाढव्य मोबदला. असा भेदभाव करून समानतेच्या हक्कापासून वंचित करण्यात येत आहे. अधिग्रहणाची सर्व प्रक्रिया नियमबाह्य करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर पूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. मग आजपर्यंत संयुक्त मोजणी का करण्यात आली नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. समान मोबदल्याची मागणी रावणवाडी, सिरपूर, मुरपार, गर्रा, कलारीटोला, गोंडीटोला येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. मात्र यातही प्रशासनाने भेदभाव करून केवळ एकाच गावाला काही प्रमाणात मोबदला वाढवून दिला आहे. त्यातही शेतकरी समाधानी नसून अधिग्रहणाच्या पूर्ण प्रक्रियेची चौकशी करून बाधितांना न्याय मिळेल, या आशेने बाधित शेतकरी शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहेत. (वार्ताहर )