शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करा

By admin | Updated: April 15, 2016 02:23 IST

मागील चार-पाच वर्षांपासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना अस्तव्यस्त स्थितीत ठप्प पडली असून ..

रजेगाव-काटी सिंचन योजना : किसान संघर्ष समितीची मागणीरावणवाडी : मागील चार-पाच वर्षांपासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना अस्तव्यस्त स्थितीत ठप्प पडली असून आजतागायत अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करण्यात आली नाही. संबंधित विभागाने या अधिग्रहित भूमिची संयुक्त मोजणी करावी, अशी मागणी किसान संघर्ष समितीने केली आहे.परिसरात शेतीच्या सिंचनासाठी सोय उपलब्ध करून हरितक्रांती निर्माण होणार, असे स्वप्न तत्कालीन सरकारने दाखविले. या हेतूने सन २००७ पासून रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेकरिता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी स्वयंनिर्णयाने बळकावण्यात आल्या. शासनाने सारे कायदे धाब्यावर बसवून भूमिअधिग्रहण केले. योजनेवर शासनाच्या कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. सर्वसाधारणपणे भूसंपादन कायद्याखाली खासगी जमीन संपादनाची कार्यवाही करताना संपादित करण्यात येणारी जमीन नेमकी कुणाची, किती व कोणती? हेच निश्चित नाही. हे निश्चित करण्यासाठी कायद्याच्या कलम ६ खालील जाहीरनामा प्रसिद्ध होण्यापूर्वी संपादित करावयाच्या जमिनीची संयुक्त मोजणी करणे आवश्यक आहे. यामागील उद्देश्य म्हणजे भविष्यात कोणताही तंटा उद्भवू नये. म्हणून संबंधित जमीनमालक व इतर संबंधित व्यक्ती, संपादन संस्थेचे प्रतिनिधी, भूमी अभिलेख, कृषी विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थितीत अधिग्रहित जमिनीची संयुक्त मोजणी करणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप संयुक्त मोजणी केलीच नसून साधी मोजणीसुद्धा आजतागायत करण्यात आली नाही. सदर योजना एकच असून अधिग्रहित जमिनीचा मोबदला दोन प्रकारे काढण्यात आलेला आहे. एका शेतकऱ्याला अत्यल्प मोबदला तर दुसऱ्या शेतकऱ्याला अवाढव्य मोबदला. असा भेदभाव करून समानतेच्या हक्कापासून वंचित करण्यात येत आहे. अधिग्रहणाची सर्व प्रक्रिया नियमबाह्य करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर पूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. मग आजपर्यंत संयुक्त मोजणी का करण्यात आली नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. समान मोबदल्याची मागणी रावणवाडी, सिरपूर, मुरपार, गर्रा, कलारीटोला, गोंडीटोला येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. मात्र यातही प्रशासनाने भेदभाव करून केवळ एकाच गावाला काही प्रमाणात मोबदला वाढवून दिला आहे. त्यातही शेतकरी समाधानी नसून अधिग्रहणाच्या पूर्ण प्रक्रियेची चौकशी करून बाधितांना न्याय मिळेल, या आशेने बाधित शेतकरी शासनाच्या निर्णयाची वाट बघत आहेत. (वार्ताहर )