शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्हाधिकारी साहेब, कडक निर्बंध कोणा-कोणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक ...

सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक निर्बंधामध्ये राज्यात कलम १४४ लागू असताना जवळपास सर्वच पक्षांचे नेते आणि राजकारण्यांनी वाटेल तेव्हा गर्दी उभी करून उद्‌घाटन व भूमिपूजन करण्याचा सपाटा चालविला असून कडक निर्बंधांची पायमल्ली करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य मजूर आणि छोटे-छोटे व्यापारी यांचे हाल बेहाल झालेले दिसत आहे. अशात समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. जिल्ह्याचे प्रशासनिक प्रमुख म्हणून या भेदभावपूर्ण व्यवहारावर जिल्हाधिकारी गप्प बसून का आहेत, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी मांडला आहे.

राज्यात ३१ मेपर्यंत कडक निर्बंध कायम असून तोपर्यंत जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू आहे. अशात जिल्ह्यात ५ पेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यास मनाई आहे. तसेच कसलेही सामूहिक सोहळे किंवा गर्दी वाढविणारे कार्यक्रम करण्यावर बंदी आहे. लॉकडाऊन काळात रोज परिश्रम करून जीवन जगणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. त्याचबरोबर छोटे-छोटे व्यवसाय करून रस्त्यावर जीवनावश्यक वस्तू विकून आपल्या घराचा गाडा चालविणारे लाचार झालेले आहेत. तरीही मुकाट्याने शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. आपल्या पोटापाण्यासाठी कोणी गरीब माणूस रस्त्यालगत काही दैनंदिन गरजेच्या वस्तू विकायला बसला की त्याचे दुकान उचलून टाकण्यात येते.

याचवेळी विविध राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आपल्यासोबत ५-१० लोकांना घेऊन कुठेही उद्‌घाटन किंवा भूमिपूजन सोहळा आयोजित करतात. एवढेच नाहीतर, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची गर्दीसुद्धा वाढवितात. अशात या लोकांसाठी निर्बंधाचे नियम नाहीत का, असा प्रश्न छोटे व्यापारी विचारीत आहेत.

या लॉकडाऊन काळात काही दबंग स्वरूपाचे लोक आपले काम बिनधास्त करतात. तर काही असामाजिक तत्त्व कोरोना नियमाचा पाढा वाचत सर्वसामान्यांना त्रास देण्याचे कामसुद्धा करीत आहेत. अशात जिल्हा प्रशासनाने सगळ्यांसाठी कठोर निर्बंध पाळायला बाध्य करावे, अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे.