शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

जिल्हाधिकारी साहेब, कडक निर्बंध कोणा-कोणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक ...

सालेकसा : कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मागील दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु या कडक निर्बंधामध्ये राज्यात कलम १४४ लागू असताना जवळपास सर्वच पक्षांचे नेते आणि राजकारण्यांनी वाटेल तेव्हा गर्दी उभी करून उद्‌घाटन व भूमिपूजन करण्याचा सपाटा चालविला असून कडक निर्बंधांची पायमल्ली करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य मजूर आणि छोटे-छोटे व्यापारी यांचे हाल बेहाल झालेले दिसत आहे. अशात समाजातील एक मोठा वर्ग नाराज आहे. जिल्ह्याचे प्रशासनिक प्रमुख म्हणून या भेदभावपूर्ण व्यवहारावर जिल्हाधिकारी गप्प बसून का आहेत, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी मांडला आहे.

राज्यात ३१ मेपर्यंत कडक निर्बंध कायम असून तोपर्यंत जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू आहे. अशात जिल्ह्यात ५ पेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यास मनाई आहे. तसेच कसलेही सामूहिक सोहळे किंवा गर्दी वाढविणारे कार्यक्रम करण्यावर बंदी आहे. लॉकडाऊन काळात रोज परिश्रम करून जीवन जगणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. त्याचबरोबर छोटे-छोटे व्यवसाय करून रस्त्यावर जीवनावश्यक वस्तू विकून आपल्या घराचा गाडा चालविणारे लाचार झालेले आहेत. तरीही मुकाट्याने शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. आपल्या पोटापाण्यासाठी कोणी गरीब माणूस रस्त्यालगत काही दैनंदिन गरजेच्या वस्तू विकायला बसला की त्याचे दुकान उचलून टाकण्यात येते.

याचवेळी विविध राजकीय पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आपल्यासोबत ५-१० लोकांना घेऊन कुठेही उद्‌घाटन किंवा भूमिपूजन सोहळा आयोजित करतात. एवढेच नाहीतर, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची गर्दीसुद्धा वाढवितात. अशात या लोकांसाठी निर्बंधाचे नियम नाहीत का, असा प्रश्न छोटे व्यापारी विचारीत आहेत.

या लॉकडाऊन काळात काही दबंग स्वरूपाचे लोक आपले काम बिनधास्त करतात. तर काही असामाजिक तत्त्व कोरोना नियमाचा पाढा वाचत सर्वसामान्यांना त्रास देण्याचे कामसुद्धा करीत आहेत. अशात जिल्हा प्रशासनाने सगळ्यांसाठी कठोर निर्बंध पाळायला बाध्य करावे, अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे.