शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळे आर्थिक बचतीचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:27 IST

आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : साखरीटोला येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. अशा आयोजनाकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच अशा सामूहिक सोहळ्यातून समाजातील लोकांची आर्थिक बचत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.साखरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि.१५) जि.प. हायस्कूलच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या १४ वर-वधू जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ. राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, नरेश रहिले, सालेकसाचे उपसभापती दिलीप वाघमारे, देवरीच्या सभापती सुनंदा बहेकार, सातगावचे सरपंच संगीता कुसराम, गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बहेकार, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सभापती रमेश ताराम, हुकुमचंद बहेकार यांच्यासह इतर समाजबांधव, महिला, पुरुष, युवक व वऱ्हाडी बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी माजी खा. नाना पटोले यांनी, या देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. त्यांनी शेतात रोवलेल्या बियांचा खर्च निघत नाही आणि त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता समाजाने व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता लढणे गरजेचे आहे, असे म्हटले. तर आ. गोपालदास अग्रवाल यांनी समाजाचे महत्व पटवून देताना संघटीत समाजासमोर सरकारही झुकते आणि या माध्यमातून आपला विकास साधता येतो, असे सांगितले.या वेळी विवाहबद्ध झालेल्या १४ वर-वधू जोडप्यांना मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमी, प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्यातर्फे भेटवस्तू वाटप करुन उपस्थित अतिथींनी सुखी सांसारिक जीवनाबद्दल आशीर्वाद दिले. प्रास्ताविक युवा कुणबी समाज समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार सचिव पृथ्वीराज शिवणकर यांनी मानले.