शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

सामूहिक विवाह सोहळे आर्थिक बचतीचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:27 IST

आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : साखरीटोला येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. अशा आयोजनाकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच अशा सामूहिक सोहळ्यातून समाजातील लोकांची आर्थिक बचत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.साखरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि.१५) जि.प. हायस्कूलच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या १४ वर-वधू जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ. राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, नरेश रहिले, सालेकसाचे उपसभापती दिलीप वाघमारे, देवरीच्या सभापती सुनंदा बहेकार, सातगावचे सरपंच संगीता कुसराम, गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बहेकार, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सभापती रमेश ताराम, हुकुमचंद बहेकार यांच्यासह इतर समाजबांधव, महिला, पुरुष, युवक व वऱ्हाडी बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी माजी खा. नाना पटोले यांनी, या देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. त्यांनी शेतात रोवलेल्या बियांचा खर्च निघत नाही आणि त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता समाजाने व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता लढणे गरजेचे आहे, असे म्हटले. तर आ. गोपालदास अग्रवाल यांनी समाजाचे महत्व पटवून देताना संघटीत समाजासमोर सरकारही झुकते आणि या माध्यमातून आपला विकास साधता येतो, असे सांगितले.या वेळी विवाहबद्ध झालेल्या १४ वर-वधू जोडप्यांना मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमी, प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्यातर्फे भेटवस्तू वाटप करुन उपस्थित अतिथींनी सुखी सांसारिक जीवनाबद्दल आशीर्वाद दिले. प्रास्ताविक युवा कुणबी समाज समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार सचिव पृथ्वीराज शिवणकर यांनी मानले.