शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

धान खरेदीवर सहकारी संस्थाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:44 IST

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देआदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्धार : शासनाकडे थकले कमिशन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही. कमिशनची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे.मात्र शासनाकडे याकडे दुर्लक्ष केल्याने यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी न करण्याचा निर्णय आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी घेतला आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघ मर्या. गोंदियाची आमसभा गुरूवारी (दि.४) येथील मॉ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष शंकर मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात महाराष्ट्र शासनाने महाराष्टÑ ट्रायबल इॅकानॉमीक कंडीशन अ‍ॅक्ट नुसार आदिवासी क्षेत्रातील शेत मालाची व किरकोळ वनोपजांची खरेदी विक्री व व्यापार करण्यासाठी महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाला मुख्य प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. तर महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना सब एजेंट म्हणून नियुक्त केले आहे.या अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी धान खरेदी करतात. मात्र महांमडळाकडून खरेदी केलेल्या धानाची वेळेची उचल करण्यास उशीर केला जातो.परिणामी धानात तुटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे संस्थेला आर्थिक फटका बसतो. महांमडळाकडे धान खरेदीचे कमिशन मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. यासाठी महामंडळाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी सहकारी संस्थानी २०१८-१९ या वर्षात धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा शंकर मडावी, उपाध्यक्ष मणिकबापू आचले, सचिव हरिशचंद्र कोहळे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग अंभोरा, भाष्कर धरमशहारे,जागेश्वर धनगाते, तुलाराम मारगाये, रमेश ताराम, कृपासागर गोपाले, प्रमोद संगीडवार, सुकचंद राऊत, राजेश राऊत, रमेश इळपाते, फगनू कल्लो, संताराम भोयर यांनी दिला आहे.दरम्यान शासन यावर काय तोडगा काढते याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.