शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पोषण आहारातील कडधान्य पुरवठा बंद

By admin | Updated: February 5, 2017 00:06 IST

राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना

विद्यार्थ्यांना फटका : मध्यान्ह भोजनापासून वंचित केशोरी : राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन देण्याची योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खाद्य निगम मुंबई यांचेद्वारा कंत्राटदारामार्फत पोषण आहाराचे कडधान्य पुरवठा न केल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शाळामधील विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकारी लक्ष न देता चुप्पी करुन बसले आहेत. शालेय पोषण आहाराअंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी तांदूळ, डाळ, हरभरा, वटाणा या साहित्याचे वाटप करण्याचे कार्य शासनाने कंत्राटदारांना दिले आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक दररोज पोषण आहाराचे साहित्य येईल याची वाट पाहत असतात. काही दिवसापर्यंत शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. मात्र गेल्या २० दिवसांपासून अजूनही पोषण आहाराचे धान्य शाळांमध्ये पोहचले नाही. परिणामी विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा झाल्याशिवाय राहणार नाही. काही शाळांमध्ये बऱ्याच दिवसापर्यंत काटकसर करुन पोषण आहार साहित्य पुरवून मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले गेले. परंतु काही अशा शाळा आहेत की त्यांचेजवळ कोणतेच साहित्य शिल्लक नसल्याने ते विद्यार्थ्याना काहीच देऊ शकत नाही किंवा कोणाकडून उसनवार साहित्य घेऊ शकत नाही. तालुक्यात परिस्थिती सारखीच आहे. शाळांतील मुख्याध्यापकांनी पर्यायी व्यवस्था करुन काही दिवस पोषण आहार सुरू ठेवला होते. आता तर त्यांच्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्वरित मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कडधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)