शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

पोषण आहारातील कडधान्य पुरवठा बंद

By admin | Updated: February 5, 2017 00:06 IST

राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना

विद्यार्थ्यांना फटका : मध्यान्ह भोजनापासून वंचित केशोरी : राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन देण्याची योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खाद्य निगम मुंबई यांचेद्वारा कंत्राटदारामार्फत पोषण आहाराचे कडधान्य पुरवठा न केल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शाळामधील विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकारी लक्ष न देता चुप्पी करुन बसले आहेत. शालेय पोषण आहाराअंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी तांदूळ, डाळ, हरभरा, वटाणा या साहित्याचे वाटप करण्याचे कार्य शासनाने कंत्राटदारांना दिले आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक दररोज पोषण आहाराचे साहित्य येईल याची वाट पाहत असतात. काही दिवसापर्यंत शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. मात्र गेल्या २० दिवसांपासून अजूनही पोषण आहाराचे धान्य शाळांमध्ये पोहचले नाही. परिणामी विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा झाल्याशिवाय राहणार नाही. काही शाळांमध्ये बऱ्याच दिवसापर्यंत काटकसर करुन पोषण आहार साहित्य पुरवून मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले गेले. परंतु काही अशा शाळा आहेत की त्यांचेजवळ कोणतेच साहित्य शिल्लक नसल्याने ते विद्यार्थ्याना काहीच देऊ शकत नाही किंवा कोणाकडून उसनवार साहित्य घेऊ शकत नाही. तालुक्यात परिस्थिती सारखीच आहे. शाळांतील मुख्याध्यापकांनी पर्यायी व्यवस्था करुन काही दिवस पोषण आहार सुरू ठेवला होते. आता तर त्यांच्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्वरित मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कडधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)