शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

खासगीकरण-फ्रँचाईसीचे धोरण बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:25 IST

शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीच्या खासगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्यावतीने सोमवारपासून (दि.७) तीन दिवसीय संप करण्यात येत आहे. यांतर्गत येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन शासन व प्रशासन विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देवीज कर्मचारी कृती समिती : कर्मचारी तीन दिवसीय संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीच्या खासगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्यावतीने सोमवारपासून (दि.७) तीन दिवसीय संप करण्यात येत आहे. यांतर्गत येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन शासन व प्रशासन विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीस वर्कस फेÞडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस यांच्या संयुक्तवतीने वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती या बॅनरखाली हा संप पुकारण्यात आला आहे. या संपांतर्गत सोमवारी (दि.७) येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाºयांनी गेट मिटींग घेतली.या मिटींगमध्ये आपल्या मागण्यांवर चर्चा करीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणा देत कर्मचाºयांनी रोष व्यक्त केला. कर्मचारी विरोधी धोरणाला घेवून पुकारण्यात आलेल्या संपामुळे वीज कंपनीचे कामकाज ठप्प पडले आहे. या तीन दिवसीय संपात जिल्ह्यातील सुमारे १४०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.गेट मिटींगमध्ये सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सहसचिव कुमार कोकणे, महावितरण वीज कामगार महासंघाचे सहसचिव योगेश्वर सोनुले, महा. स्टेट इलेक्ट्रीक वर्कर्स फेडरेशनचे सचिव विवेक काकडे, खुशाल सोनी, सुनील रेवतकर, सुनील मोहुर्ले, गणेश चव्हाण, विजय चौधरी, अशोक ठक्कर, विनोद चौरागडे, कृष्णा बडवाईक, आर.डी.फुलमाळी, सुनील बांते, एस.बी.रहांगडाले, प्रतिभा मेंढे, ओमेश्वर रहांगडाले, लुकेश्वरी टेंभरे, शंभरकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.या आहेत समितीच्या मागण्यामहापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करताना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणा, महावितरण कंपनीतील प्रस्तावीत पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणा, शासन व व्यवस्थापन राबवित असलेले महावितरण कंपनीचे खाजगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत थांबवा, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फॅ्रँचाईसीवर खासगी भांडवलदार कंपनींना देण्याची प्रक्रिया त्वरीत थांबवा, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत लघु जल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या २१० मेगावॉटचे संच बंद करण्याचे धोरण त्वरीत थांबवावे, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने तिन्ही कंपन्यांतील कर्मचाºयांकरिता मान्य केलेली राज्य शासनाच्या जुन्या पेंशन योजनेच्या पार्श्वभूमिवर पेंशन योजना लागू करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे त्वरीत भरा, तिन्ही कंपन्यांतील बदली धोरणाचा पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबवा, कंत्राटी व आऊटसोर्सींग कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्या, व समान काम, समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा या मागण्यांसाठी वीज कर्मचाºयांनी संप पुकारला आहे.