शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज न देणाऱ्या बँकांमधून शासकीय खाते बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

गोंदिया : खरीप हंगामात पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, या बँकेने ७० टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ ...

गोंदिया : खरीप हंगामात पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, या बँकेने ७० टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षी मागे राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी पीककर्जाचे वाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेले शासकीय कार्यालयांचे बँक खाते बंद करून दुसऱ्या बँकेत उघडण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी (दि.२५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पथदीप आणि पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींना थकीत वीजबिल भरण्यासाठी १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे ही समस्यासुद्धा आता दूर होणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खते, बियाणे यांचा बफर स्टॉक उपलब्ध असून, तुटवडा नसल्याचेदेखील पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

..........

रब्बी धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ?

रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यापुढे उघड्यावर धान खरेदी केली जाणार नसून वखार महामंडळाशी चर्चा करून गुदामे उपलब्ध केली जाणार आहे.

..............

धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई

मागील खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी राइस मिलर्सने करार केले आहेत. पण त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नसल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

..............

लसीकरणाची गती वाढविणार

जिल्ह्यात आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिकांचे ६० टक्के, ४५ वर्षांवरील नागरिकांचे ५२ टक्के आणि १८ वर्षांवरील नागरिकांचे ५ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाचा भर आहे. शुक्रवारी जिल्ह्याला ३० हजार लसीचे डोस प्राप्त होणार आहे. त्यामुळे लसीकरण माेहिमेची गती वाढविण्यास मदत होणार आहे.

..........

१५ जुलैपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज

डेल्टा प्लस या आजाराचे रुग्ण महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातसुद्धा या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तर १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सहा ऑक्सिजन जनरेशन प्लांट, ९०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर असून, पुन्हा ५०० जम्बो सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहे. तर सरकारी रुग्णालयात ११०० आणि खासगी रुग्णालयात ९०० असे एकूण दोन हजार बेड सज्ज ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

.............