शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

राजनडोंगरी जंगलातील वृक्ष कटाई बंद करा

By admin | Updated: November 22, 2014 23:05 IST

वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून

देवरी : वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ सालई हलका गट क्रमांकाच्या जागेवरील ६६.५० हेक्टर पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपूर्ण कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. मात्र या जंगल कटाईला राजनडोंगरी जंगल परिसरातील ९० टक्के आदिवासी लोकांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीकोणातून बंद पाडले आहे. या राजनडोंगरी गावातील आदिवासी लोकांच्या मते सन १९९० पासून सदर जंगल वनविभागाने वनविकास महामंडळाला सुपूर्द केले. तेव्हापासून या जंगलात दोन वेळा वनिकरणाच्या विविध योजनेंतर्गत या जंगलाची चापल कटाई करून या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन झाडे लावण्यात आली होती. आता यावेळी सुद्धा संपुर्ण जंगलात चापल कटाई करण्याचा सपाटा १४ नोव्हेंबरपासून वनविकास विभागाने लावला आहे. त्यानुसार राजनडोंगरी जंगल कक्ष क्रमांक ५९८ मधील ६६.५० हेक्टर जागा पैकी ३२ हेक्टर जागेवरील जंगलात संपुर्ण चापल कटाई करण्याची शासनाकडून परवानगी घेऊन येथील वनविकास विभागाकडून सदर जंगल कटाईला मागील १४ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.सदर गावातील झाडाची कटाई गावातील आदिवासी लोकांच्या पुढाकाराने पर्यावरणाच्या रक्षणाकरिता बंद पाडण्यात आली आहे. या गावच्या लोकांच्या मते सदर जंगल कटाई करण्याकरीता ग्रा.पं. नकटी किंवा वन हक्क समिती पदाधिकाऱ्यांना विचारपुस करुन परवानगी घेतली नाही. तसेच यांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच या जंगलात वनिकरण केल्यानंतर आमच्या घरची गुरे-ढोरे चरायला कुठे नेणार? आमच्या गावच्या लोकांना ईमारतीसाठी लाकडे लागल्यावर आणायची कुठून असा प्रश्न उपस्थित केला. जर या जंगलात वनिकरण करायचे असेल तर खुल्या जागेवर करावे. आम्ही फक्त झाडे तोडण्यास व कटाई करण्यास मनाई करीत आहो. केंद्र सरकार व राज्य सरकार पर्यावरणाच्या संरक्षणाकरीता विविध योजने द्वारे झाडे लावा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करा असे म्हणते. तर जीवंत मोठी झाडे कापून त्या जागेवर वनिकरन करा असे सांगत नाही. परंतु वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी असे कृत्य कशासाठी करीत आहेत हे कळत नाही.आता या जंगलातील सागवन जातीचे दोन झाड, ककईचे तीन, बिजाचे तीन, मोवईचे दोन, गराडीचे सात, सिहनाचे दोन, भेराचे तीन आणि धावडा जातीचे एक अशी २३ झाडे कापून बीट तयार करण्यात आले आहे. याबाबद राजनडोंगरीवासीयांनी ग्रा.पं. नकटी, वनपरिक्षेत्र अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे.