शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

जिल्ह्यातील १८० उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:17 IST

जिल्ह्यात अदानी प्रकल्प सोडला तर मोठे उद्योग नाही. परंतु छोट्या उद्योगांची नोंदणी २२५८ आहेत. मात्र यातील १८० उद्योग बंद झाले आहेत.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात अदानी प्रकल्प सोडला तर मोठे उद्योग नाही. परंतु छोट्या उद्योगांची नोंदणी २२५८ आहेत. मात्र यातील १८० उद्योग बंद झाले आहेत. २०७८ लघु उद्योग सुरू असावेत असा अंदाज जिल्हा उद्योग केंद्राचा आहे. विशेष म्हणजे कोणते उद्योग सुरू आणि कोणते उद्योग बंद आहेत याची शहानिशा मागील सात वर्षापासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा उद्योगाच्या बाबतीत उदासीन ठरत आहे. जिल्ह्यात ३५० राईस मील, फ्लाय अ‍ॅश विटांचे २५ कारखाने, प्लास्टीकचे ४० युनिट, आरओ प्लांट १०, फेब्रीकेशन व इतर उद्योग मिळून असे २ हजार २५८ उद्योगांची नोंद जिल्हा उद्योग केंद्रात आहे. या उद्योगांचे सर्वेक्षण २००८-०९ या वर्षात केले होते. त्यावेळी सर्वेक्षणात नोंदणी असलेल्यापैंकी १८० उद्योग बंद असल्याचे लक्षात आले होते. परंतु आता सात वर्ष उलटूनही सर्वेक्षण न झाल्यामुळे सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात किती उद्योग बंद आहेत याची निश्चित आकडेवारी या कार्यालयाकडे नाही. आधी सर्वेक्षण निरीक्षक उद्योगाच्या ठिकाणी भेटी देऊन ते उद्योग सुरू आहेत किंवा नाही याची पाहणी करीत होते. परंतु निरीक्षकांचा दौरा शासनाने बंद केल्याने किती उद्योग सुरू, किती उद्योग बंद आहेत याची माहिती या उद्योग केंद्रालाच नाही. नोंदणी करण्यात आलेल्या २२५८ उद्योगांवर फक्त ९२२ कामगार कामावर असल्याची या कार्यालयात नोंद आहे. आता आॅनलाईन उद्योगांची नोंदणी करण्याचे काम सुरू असल्यामुळे या कार्यालयाला किती उद्योग आहेत हेही सांगता येणार नाही. कामगारांची माहितीच नाहीजिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. परंतु या उद्योगांवर काम करणाऱ्या कामगारांची नोंद फक्त ९२२ च्या घरात आहे. याचाच अर्थ हजारो कामगारांची माहिती उद्योग चालविणाऱ्यांनी या उद्योग केंद्राला दिली नाही. कामगार कायद्यांतर्गत त्या कामगारांना आर्थिक लाभ न दिल्यास मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतील हे गृहीत धरून त्या कामगारांची नोंदणी त्यांनी केली नसावी.कार्यालय फक्त मार्गदर्शनापुरतेजिल्हा उद्योग केंद्राचा लाभ आता सुशिक्षित बेरोजगारांना होणार नाही. हे कार्यालय फक्त तरूणांना मार्गदर्शन करण्याचे कार्यालय होऊन बसले आहे. परंतु मार्गदर्शन किंवा कार्यशाळा केलेल्या तरूणांना पुढची दिशा, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज, त्यांना बँकाकडून उपलब्ध होत नसल्यास मार्गदर्शन कामाचे नाही. आधी या कार्यालयाकडून कर्ज किंवा अर्थसहाय्य देण्यात येत होते. परंतु आता तरूणांना काहीच सहकार्य मिळत नाही. पंतप्रधान रोजगार निर्मिती रखडलीदेशातील सुक्ष्म व लघु उद्योग शहरात व ग्रामीण भागात स्थापन करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मीती योजना अंमलात आणली. परंतु या योजनेची उद्दीष्ट्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साध्य न झाल्यामुळे यावर्षी एकाही तरूणाला उद्योगासाठी अनुदान देणार नाही असा प्रवित्रा शासनाने घेतल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.