शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था

By admin | Updated: August 20, 2014 23:36 IST

विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय

विद्यार्थ्यांची गैरसोय : आरोग्यविषयक हेळसांड थांबविण्याकडे दुर्लक्ष इटखेडा : विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय मानसिक आरोग्य सुदृढ राहत नाही, असे म्हटले जाते. तरीही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, त्यांची अवस्था अत्यंत भयावह आहे.स्वच्छतागृहाची दारे तुटली आहेत. वरचे छप्परही जागेवर नाही. सभोवताल काडीकचरा, विटाचे तुकडे, मातीचे ढिगारे, वाढलेले गवत निदर्शनास येते. शौचास बसण्यासाठी लावलेल्या सिट्स तुटलेल्या, कोळीष्टके, रेती, विटाच्या तुकड्यांनी सिटा बुजलेल्या, पाण्याच्या सोयीचा अभाव इत्यादीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लघवी किंवा शौचास लागली असताना त्या स्वच्छतागृहात जाता येत नाही. स्वच्छतागृहात जाणे शक्य नसल्याने मुलांना मुत्रविकार व बध्दकोष्ठतासारखे विकार बळावण्याची शक्यता असते. या साध्या बाबी लक्षात घेतल्यास शाळेने मुख्याध्यापक, व्यवस्थापन, शिक्षक, पालक व शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसाड करीत असल्याचे निदर्शनास येते. शिक्षणाविषयी पालक जागरूक असले तरी ज्या शाळेत आपली मुले शिकतात. त्या शाळेतील स्वच्छतागृहे व परिसर स्वच्छ आहेत की काय याबद्दल चकार शब्द काढत नाही. विद्यार्थीही याबाबत बोलत नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थीनीची मोठीच कुंचबना होते. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी किती मुले हात धुतात, जेवण्याची ताटे स्वच्छ आहेत काय, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ आहेत काय अशा कितीतरी बाबींची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शाळा परिसर, स्वच्छतागृहे व वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे अपरिहार्य आहे. अन्यथा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढणार एवढे मात्र निश्चित आहे. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक हेळसांड थांबवावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)