शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था

By admin | Updated: August 20, 2014 23:36 IST

विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय

विद्यार्थ्यांची गैरसोय : आरोग्यविषयक हेळसांड थांबविण्याकडे दुर्लक्ष इटखेडा : विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय मानसिक आरोग्य सुदृढ राहत नाही, असे म्हटले जाते. तरीही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, त्यांची अवस्था अत्यंत भयावह आहे.स्वच्छतागृहाची दारे तुटली आहेत. वरचे छप्परही जागेवर नाही. सभोवताल काडीकचरा, विटाचे तुकडे, मातीचे ढिगारे, वाढलेले गवत निदर्शनास येते. शौचास बसण्यासाठी लावलेल्या सिट्स तुटलेल्या, कोळीष्टके, रेती, विटाच्या तुकड्यांनी सिटा बुजलेल्या, पाण्याच्या सोयीचा अभाव इत्यादीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लघवी किंवा शौचास लागली असताना त्या स्वच्छतागृहात जाता येत नाही. स्वच्छतागृहात जाणे शक्य नसल्याने मुलांना मुत्रविकार व बध्दकोष्ठतासारखे विकार बळावण्याची शक्यता असते. या साध्या बाबी लक्षात घेतल्यास शाळेने मुख्याध्यापक, व्यवस्थापन, शिक्षक, पालक व शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसाड करीत असल्याचे निदर्शनास येते. शिक्षणाविषयी पालक जागरूक असले तरी ज्या शाळेत आपली मुले शिकतात. त्या शाळेतील स्वच्छतागृहे व परिसर स्वच्छ आहेत की काय याबद्दल चकार शब्द काढत नाही. विद्यार्थीही याबाबत बोलत नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थीनीची मोठीच कुंचबना होते. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी किती मुले हात धुतात, जेवण्याची ताटे स्वच्छ आहेत काय, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ आहेत काय अशा कितीतरी बाबींची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शाळा परिसर, स्वच्छतागृहे व वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे अपरिहार्य आहे. अन्यथा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढणार एवढे मात्र निश्चित आहे. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक हेळसांड थांबवावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)