शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

शहरात स्वच्छता फक्त सर्वेक्षणापुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:21 IST

आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

ठळक मुद्देबघावे तेथे कचऱ्याचे ढीग : शहरवासीयांच्या उमटताहेत प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मात्र गोंदिया शहराला याच्याशी काहीच देणे-घेणे दिसून येत नाही. कारण शहरात फक्त सर्वेक्षणापुरतीच स्वच्छता केली जात असल्याचे दिसते. हेच कारण आहे की, आज शहरात बघावे तेथे कचऱ्याचे ढीग दिसून येत असून शहर किती स्वच्छ आहे याची प्रचिती येते.उत्तम आरोग्यासाठी आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. यातून गावच काय शहरही स्वच्छ असावे व देशवासीयांना शुद्ध वातावरणात श्वास घेता यावा यासाठी शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. या मोहिमेंतर्गत गावांपासून ते शहरांसाठी काही निकष ठरवून देत त्यावर रँकींग केले जाते. यासाठी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. शासनाची योजना असल्याने कित्येक गाव व शहरांकडून त्यात हिरीरीने भाग घेवून काही चांगले करण्याचा इमानदारीने प्रयत्न केला जातो. तर काही मात्र करायचे आहे म्हणून करतात असे ही बघावयास मिळते.गोंदिया नगर परिषदेच्या बाबतीतही तसेच काही घडून येत असल्याचे खुद्द शहरवासी बोलत असून तशीच काहीशी स्थितीही बघावयास मिळते. नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिमेच्या काळात मोठा जोर लावला जातो.स्वच्छतेसाठी विविध प्रकारे धडपड करून आपले शहर स्वच्छ दिसावे यासाठी केवीलवाने प्रयत्न केले जातात. समिती सर्वेक्षणासाठी येताना त्यांना खूश करण्यासाठी होर्डींगबाजीपासून तर कचराकुंड्या लावणे, रात्रीची सफाई व अन्य प्रयोग केले जातात.हेच सर्व काही यावर्षीही घडले. मात्र यंदा समितीने शहराची व नगर परिषदेच्या या थातूरमातूर प्रयत्नांची वास्तवीकता जाणून घेतली. परिणामी, यंदाच्या सर्वेक्षणात शहराचे रँकींग घसरले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलीच घसरण झाल्याने नगर परिषद स्वच्छता विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती समितीने अवघ्या शहरवासीयांना दाखवून दिली. म्हणूनच, शहरात फक्त स्वच्छ सर्वेक्षमापुरतीच स्वच्छता होत असल्याचे आता शहरवासी बोलत आहेत.फक्त पैशांची उधळणस्वच्छ सर्वेक्षणाच्या काळात नगर परिषदेकडून स्वच्छता विषयक कामे करण्यासाठी फक्त पैशांची उधळण केली जात असल्याचे दिसते. होर्डींगबाजीवरच लाखो रूपये ओतले जातात. जनजागृतीसाठी गावात पोंगे फिरवून त्यावर पैसे खर्च केले जातात. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी कंटेनर लावणे तर सिमेंटच्या कुंड्या तयार करणे यावर पैसे ओतले जात असल्याचे दिसले. विशेष म्हणजे, हे सर्व होत असताना ‘जीआर’ मध्येच तरतूद असल्याचे बोलून हात मोकळे केले जात आहे.