शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

तिरोड्यात बंद, गोंदियात फज्जा

By admin | Updated: December 18, 2015 02:15 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्यात यावरून वाढलेल्या असंतोषाचा भडका उडत गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला. मात्र या संपाचा परिणाम जिल्ह्यातील दोनपैकी केवळ तिरोडा आगारात दिसून आला. गोंदिया आगारातील बसफेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होत्या. त्यामुळे गोंदिया आगारात या संपाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.लगतच्या भंडारा जिल्ह्यातील एसटीच्या पवनी, साकोली, तुमसर तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आगाराचे कामकाज १०० टक्के बंद होते. भंडारा आगारातील कामकाम ५० टक्के बंद होते तर गोंदिया आगारातील बसगाड्या पूर्णपणे सुरू होत्या. मागील वर्षी गोंदिया आगारातील ज्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता, त्या कर्मचाऱ्यांचा एका दिवसासाठी आठ दिवसांचा पगार कपात करण्यात आला होता. याच पगार कपातीचा धसका गोंदिया आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाही. मात्र सर्वच कामगारांचे सहकार्य मिळाले तर शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्याची शक्यता असल्याचे कामगारांशी केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस ही संघटना राज्यभर कार्यरत आहे. याशिवाय राज्यभरात एसटी कामगारांच्या १७ संघटना आहेत. गोंदिया आगारात कामगारांच्या पाच संघटना आहेत. या पाचही संघटनांमध्ये पगार कपातीची भीती असल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. ज्यांचा पगार कमी आहे, अशा कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांचा सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.गोंदिया आगाराच्या बसफेऱ्या शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून स्कूल बसेस सुरू ठेवण्यास प्राधान्य देवू, इतर फेऱ्यांचा नंतर विचार केला जाईल. मात्र हे सर्व कामगारांवर अवलंबून आहे, अशी माहिती गोंदिया आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुरूवारी गोंदिया आगाराच्या केवळ दोन फेऱ्या सुरूवातीला रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र काही वेळाने त्यासुद्धा अपडेट करण्यात आल्या. दरम्यान सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास शुक्रवारी हा बंद आणखी तीव्र होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बसच्या काचा फोडल्यागुरूवारी गोंदिया आगाराच्या बसेस सर्वच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र साकोली आगार १०० टक्के बंद असल्याने व ठिकठिकाणी आंदोलनकर्ते असल्याने बसेस रिकाम्याच परतल्या. साकोली, बिर्सी फाटा, सौंदड, सेंदूरवाफा टोल नाक्यावरून गोंदिया आगाराच्या बसेस रिकाम्याच्या परत पाठविण्यात आल्या. साकोलीजवळ गोंदिया आगाराच्या एका बसच्या काचासुद्धा फोडण्यात आल्याचे गोंदिया आगाराकडून सांगण्यात आले.तिरोडा आगाराचे होणार ३.५ लाखांचे नुकसानसन २०१२ ते २०१६ साठी जो कामगार करार झाला, तो रद्द करून सन २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी एसटीच्या कामगारांनी संप पुकारला. तिरोडा आगारातील कामगारांनी संपाला उत्तम प्रतिसाद दिल्याने तेथील सर्वच बसफेऱ्या बंद होत्या. चालक संपात सहभागी तर वाहक आॅन ड्युटी आणि वाहक संपावर तर चालक आॅन ड्युटी, असा प्रकार तिरोडा आगारात गुरूवारी घडला. त्यामुळे तिरोडा आगाराच्या बसेस धावू शकल्या नाही. या प्रकारामुळे एका दिवसात तिरोडा आगाराला साडेतीन लाख रूपयांचे नुकसान सहन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.