शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास ...

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व किटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नगर पंचायतीने डासनाशक फवारणी करण्याची गरज आहे.

दवनीवाडा ते गंगाझरी बसफेरी सुरू

परसवाडा : गोंदिया आगाराची दवनीवाडा-गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी मागील दीड वर्षापासून बंद होती. जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात आला. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. शिवाय बसफेऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. दवनीवाडा- गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी गोंदिया आगारप्रमुखांना पत्र देऊन केली होती. त्याचीच दखल घेत ही बसफेरी गुरुवारपासून (दि.१२) सुरू केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. छाया दसहरे, हितेंद्र लिल्हारे, काशीराम लांजेवार यांनी बस सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.

देवरीत विजेचा लपंडाव; ऑनलाईन कामांचा खोळंबा

देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. दिवसांतून चार पाच वेळा वीजपुरवठा ठप्प होता. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे.

देवरी येथील विद्युत उपकेंद्र अगोदर ६६ केव्हीचे होते. परंतु मागील ८ वर्षांपासून ते ३३ केव्ही करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाच्या दृष्टीने जास्त विजेची मागणी होत आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र असल्याने व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना जास्तीची वीज लागत असल्याने देवरी शहरातील लोकांना त्याचा फटका बसत आहे.

रात्री विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोराेनामुळे शाळा, काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे.

वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नयेत, असा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. विजेच्या अनेक समस्या असताना वीजबिले मात्र अव्वाच्या सव्वा पाठविली जातात. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी देवरीवासीयांनी केली आहे.