शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास ...

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व किटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नगर पंचायतीने डासनाशक फवारणी करण्याची गरज आहे.

दवनीवाडा ते गंगाझरी बसफेरी सुरू

परसवाडा : गोंदिया आगाराची दवनीवाडा-गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी मागील दीड वर्षापासून बंद होती. जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात आला. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. शिवाय बसफेऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. दवनीवाडा- गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी गोंदिया आगारप्रमुखांना पत्र देऊन केली होती. त्याचीच दखल घेत ही बसफेरी गुरुवारपासून (दि.१२) सुरू केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. छाया दसहरे, हितेंद्र लिल्हारे, काशीराम लांजेवार यांनी बस सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.

देवरीत विजेचा लपंडाव; ऑनलाईन कामांचा खोळंबा

देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. दिवसांतून चार पाच वेळा वीजपुरवठा ठप्प होता. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे.

देवरी येथील विद्युत उपकेंद्र अगोदर ६६ केव्हीचे होते. परंतु मागील ८ वर्षांपासून ते ३३ केव्ही करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाच्या दृष्टीने जास्त विजेची मागणी होत आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र असल्याने व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना जास्तीची वीज लागत असल्याने देवरी शहरातील लोकांना त्याचा फटका बसत आहे.

रात्री विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोराेनामुळे शाळा, काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे.

वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नयेत, असा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. विजेच्या अनेक समस्या असताना वीजबिले मात्र अव्वाच्या सव्वा पाठविली जातात. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी देवरीवासीयांनी केली आहे.