शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास ...

शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी

सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व किटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नगर पंचायतीने डासनाशक फवारणी करण्याची गरज आहे.

दवनीवाडा ते गंगाझरी बसफेरी सुरू

परसवाडा : गोंदिया आगाराची दवनीवाडा-गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी मागील दीड वर्षापासून बंद होती. जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात आला. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. शिवाय बसफेऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. दवनीवाडा- गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी गोंदिया आगारप्रमुखांना पत्र देऊन केली होती. त्याचीच दखल घेत ही बसफेरी गुरुवारपासून (दि.१२) सुरू केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. छाया दसहरे, हितेंद्र लिल्हारे, काशीराम लांजेवार यांनी बस सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.

देवरीत विजेचा लपंडाव; ऑनलाईन कामांचा खोळंबा

देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. दिवसांतून चार पाच वेळा वीजपुरवठा ठप्प होता. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे.

देवरी येथील विद्युत उपकेंद्र अगोदर ६६ केव्हीचे होते. परंतु मागील ८ वर्षांपासून ते ३३ केव्ही करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाच्या दृष्टीने जास्त विजेची मागणी होत आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र असल्याने व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना जास्तीची वीज लागत असल्याने देवरी शहरातील लोकांना त्याचा फटका बसत आहे.

रात्री विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोराेनामुळे शाळा, काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे.

वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नयेत, असा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. विजेच्या अनेक समस्या असताना वीजबिले मात्र अव्वाच्या सव्वा पाठविली जातात. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी देवरीवासीयांनी केली आहे.