शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

शहरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2017 00:53 IST

भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत.

सहकारनगरवासी तहानलेले : महिन्याभरापासून नळाला पाण्याचा थेंब नाहीतिरोडा : भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत. ३३ वर्षे जुनी पाईपलाईन असल्याने पाण्याचा दाब वाढल्यास पाईपलाईन फुटते व ती पुन्हा आपल्यालाच दुरुस्त करावी लागते. या भितीपोटी दाब न वाढविता पाणी देणे सुरू असल्याने शहराच्या कित्येक भागात पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. सहकार नगर सारख्या काही भागात तर नळाला मागील महिन्याभरापासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. शहरात कोठेही सार्वजनिक नळ नाही. जेवढे पाणी देण्यात येते त्या पाण्याचे पैसे ग्राहक देतात. आता भारनियमन होत नाही, नदीला पाणीही भरपूर आहे. तरिही महराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून अतिरीक्त काही तास पाणी का सोडले जात नाही हा संशोधनाच विषय आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता विजेचे बिल जास्त येते असे सांगण्यात येत आहे. त्यामानाने पाण्याच्या बिलातून पैसे वसूल होत नसल्याचे सांगण्यात येते. एकही सार्वजनिक नळ नसताना सर्व पाणी मिटरधारकांकडे ग्राहकांकडे जाते व रिडिंगनुसार बिल येते.दुसरीकडे सहकार नगरात दोन-तीन महिने पाण्याचा थेंबही न घेता मिनिमम चार्जच्या नावावर १५०-१६० रुपये दरमहा घेतले जाते. पाण्याचा थेंब नसताना बिलाचे पैसे का म्हणून भरावेत व याबाबत प्राधिकरणाने सखोल चौकशी करून ज्यांच्याकडे २-३ महिने पाणी देवू शकत नाही त्यांना पाण्याचे बिल पाठवू नये असेही नागरिक बोलत आहेत. अनेक तक्रारी करुन सुद्धा प्रशासन गाढ झोपेत आहे. अधिकारी आपल्या कार्यालयात कुलरच्या हवेत गारवा घेतात. जनप्रतिनिधी मस्त लग्नात खुश असून नवीन पाईपलाईन व नळ योजना येत असल्याचे नागरिकांना गाजर देत आहेत. सहकार नगरातील बाया, मुली, मुले कमीतकमी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहीद मिश्रा वॉर्डातील काही ओळखीच्या ठिकाणी जावून पाणी आणतात. अशावेळेस तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील मुख्य चौक ओलांडावा लागतो. येथे वाहने भरधाव वेगाने धावत असतात. पाण्यासाठी जात असताना अपघात झाल्यास संतापाची लाट उसळेल. त्यावेळेस जनआंदोलनास प्रशासनाला सांभाळणे कठिण होईल ऐवढे मात्र खरे. सहकार नगर, संत कबीर वॉर्ड तसेच इतरही ठिकाणावरुन काही महिलांनी ‘घागर मोर्चा’ काढण्यासाठी कंबर कसली असून लवकरच याबाबत प्रशासनाला माहितीवजा कागदपत्रे व सुचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून साई कॉलनी परिसरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शहरवासीयांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीची गरजपाण्यासाठी हाहाकार माजलेला असताना टुल्लू पंप लावून पाणी खेचण्याचे प्रकार शहरात घडतात. अशात मात्र अन्य नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा होत असताना त्या वेळेत भारनियमन करण्याची गरज आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला आदेश देवून विशिष्ट काळासाठी भारनियमन करुन सर्वांना पिण्याचे पाणी मिळवून देतील एवढीच जनतेची अपेक्षा आहे.