शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:43 IST

येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महामार्ग पार करुन जातात महिला : अपघाताची शक्यता

डी.आर.गिेºहेपुंजे।लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. मात्र ग्राहकांना देयक नियमित पाठविले जाते. ग्राहकांनी याची तक्रार जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे केली. मात्र त्याचा कसलाही उपयोग झाला नाही. ही नळयोजना ३५ वर्षे जुनी असून नवीन नळयोजना मंजुर झाली आहे. लवकरच तुम्हाला पाणी मिळेल. असे आश्वासन लोकप्रतिनिधी गेल्या तीन-चार वर्षांपासून देत आहेत.जुन्या नळ योजनेचे पाईप सिंमेटचे आहेत. प्रेशर वाढविल्यास ते फुटतात. त्यामुळे ती दुरुस्ती आपल्यालाच करावी लागणार या भितीने जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी प्रेशर वाढवित नसल्याची माहिती आहे. जास्त वेळ पंम्पीग केल्यास नळाला पाणी येऊ शकते. पण वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी, विद्युत देयक जास्त येते, पाण्याच्या पाणीपट्टीतून तेवढा पैसा जमा होत नाही. असे कारण पुढे करुन याकडे दुर्लक्ष करतात.शहरात कुठेही सार्वजनिक नळ नाहीत. प्रत्येकाकडे मिटर लागलेले आहेत. तरीही पाण्याची चोरी होते. तर दुसरीकडे नागरिक, महिला पाण्यासाठी भटकतात.सहकार नगरात पाणीच येत नसल्याने येथील अबालवृद्ध महिला तिरोडा गोंदिया- महामार्ग ओलांडून शहिद मिश्रा वॉर्डात पाण्यासाठी सकाळ-संध्याकाळ जाताना दिसतात. अशात कधी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लिकेज, टुल्लू पंपमुळे अडचणशहराच्या इतरही काही भागात नळाच्या पाण्याची स्थिती फारच वाईट आहे. पिण्याचे पाणी आवश्यक असल्याने दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सहकार नगरात पाणी येत नाही. याबाबत जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी मडके यांच्याशी संपर्क साधून समस्या सांगितली असता लिकेज आणि टुल्लू पंपमुळे पाणी पोहचत नसल्याचे त्यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरात सलग नाल्याची व्यवस्था नसल्याने शहरातील सांडपाणी शहरातच मुरते. त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. शहरातील विहिरींच्या बाजुनेच सांडपाणी मुरते. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. नगर परिषदेतर्फे ब्लिचिंग पावडरचा वापर देखील केला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.