शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना मास्क लावण्याचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील ...

केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील नागरिक मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून बेजबाबदार नागरिकांपुढे प्रशासनाने गुडघे टेकले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी गावात येणाऱ्या नवीन व्यक्तींना गावाच्या वेशीवरच रोखून विलगीकरण केंद्रात पाढविले जात होते. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीवर आळा बसला होता. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करून सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. त्यामध्ये मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम निश्चित केले गेले. कोरोनामुक्त जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन अहोरात्र झटत आहे; परंतु कोणत्याही नागरिकाकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ रुग्णांचा समावेश आहे.

नवीन वर्षात कोरोनापासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा असताना मार्च महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने मास्कचा वापर नियमित करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. आता कोरोनाचा वाढता उद्रेक बघता नागरिकांनीच आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरोनापासून मुक्ती मिळणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.