शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

नागरिकांना मास्क लावण्याचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST

केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील ...

केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील नागरिक मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून बेजबाबदार नागरिकांपुढे प्रशासनाने गुडघे टेकले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी गावात येणाऱ्या नवीन व्यक्तींना गावाच्या वेशीवरच रोखून विलगीकरण केंद्रात पाढविले जात होते. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीवर आळा बसला होता. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करून सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. त्यामध्ये मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम निश्चित केले गेले. कोरोनामुक्त जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन अहोरात्र झटत आहे; परंतु कोणत्याही नागरिकाकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ रुग्णांचा समावेश आहे.

नवीन वर्षात कोरोनापासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा असताना मार्च महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने मास्कचा वापर नियमित करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. आता कोरोनाचा वाढता उद्रेक बघता नागरिकांनीच आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरोनापासून मुक्ती मिळणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.