शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत ते नगरपरिषदेच्या वादात भरडले जातेय नागरिक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

आमगाव : आमगाव ग्रामपंचायत ते नगरपरिषदेचा निर्माण खडसर प्रवास सुरू आहे. सध्या हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. पण शासन आणि ...

आमगाव : आमगाव ग्रामपंचायत ते नगरपरिषदेचा निर्माण खडसर प्रवास सुरू आहे. सध्या हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. पण शासन आणि प्रशासनाच्या धोरणामुळे नागरिक यात भरडले जात आहेत. विकासकामांसाठी राजकीय नेते अपयशी ठरले तर अधिकाऱ्यांच्या चलता है च्या धोरणात या भागाचा विकास मात्र खुंटत चालला आहे.

राज्य शासनाने आमगाव ग्रामपंचायतला सन २०१५ ला नगरपंचायत म्हणून नव्याने स्थापना केली तर तद्नंतर नागरिकांच्या मागणीप्रमाणे पुन्हा सन २ ऑगस्ट २०१७ ला न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार आठ गाव मिळून नगरपरिषद निर्माण करण्यात आली. मात्र यावरून श्रेयाचे राजकारण सुरु झाले.

त्यानंतर या विषयावरील निर्णय प्रलंबित आहे. वर्तमानात स्थितीत नगरपरिषद अद्यावत आहे. नगरपरिषद अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे, रोजगार, जमीन हक्क प्रकरण, रस्ते, गटार नाले विकास, नागरिकांना मिळणारे हक्काचे आवास योजनांचा लाभ याबाबतीत मात्र न्याय मिळवून देण्यासाठी कुठेच प्रयत्न होताना दिसत नाही. आमगाव नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना विकास कामे ग्राह्य असताना त्यांना विकासापासून दूर ठेवले जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने अनेक योजनांचे कृती आराखडा तयार करून जिल्हा नगरविकास विभाग व नगरविकास मंत्रालयाकडे पाठवून पाठपुरावा केला. परंतु या प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना अद्यापही यश आले नाही. नगरविकास विभागाने याकडे डोळेझाक करुन योजनांच्या प्रस्तावांना फाईल बंद करून ठेवले आहे.

.......

विकास कामे अडकली फाईलमध्ये

आमगाव नगर परिषदेत समाविष्ट आठ गावातील लोकसंख्या विचारात घेता विकास कामांची गरज असून याकडे दुर्लक्ष झाले आहे. आवश्यक कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही. यात नागरिकांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२०२० ला विशेष अनुदान योजनेतून आठ कोटींचे बांधकाम मंजूर करण्यात आले. परंतु आर्थिक वर्ष २०२०-२०२१ संपले असून सुद्धा सदर मंजूर कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आले नाही.

त्यामुळे मंजूर कामे ठप्प पडली आहे.

...........

श्रेय घेणारे आता गेले कुठे

नगरपरिषद स्थापन करण्यासाठी ज्यांनी श्रेय लाटण्यासाठी पुढाकार घेतला, तर ज्यांनी नगरपरिषद नको म्हणून लढा दिला असे लोकप्रतिनिधी आता आहेत कुठे ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिक फक्त टॅक्स मोजत आहेत, पण विकास नाही. ही सर्व नागरिकांसाठी शोकांतिका आहे. जनतेने यासाठी संघर्ष पेटवायला हवा अशी प्रतिक्रिया माजी उपसरपंच रवी क्षीरसागर यांनी व्यक्त केली.