शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ४० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ४० गावांची निवड केली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या होणार दूर : राज्य शासनाची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ४० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेची कामे केली जाणार आहेत.ग्रामीण भागातील जनतेला अनेकदा पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबून त्यांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, आपलं पाणी, नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीरीवरील योजना, लघु नळपाणी पुरवठा योजना यासारख्या योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविण्यात आले आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना धान या मुख्य पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे.पाण्याच्या अतिउपशामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस घटत आहे. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणामुळे ग्रामीण पाणी पुरवठ्यावर देखील प्रचंड ताण येत आहे.या बाबींचा राज्य शासनाने विचार करुन ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करु न ग्रामीण जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म ही योजना जिल्ह्यातील ४० गावांसाठी राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४० गावात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.योजनेत या गावांचा समावेशमुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील दहेगाव. देवरी तालुका- शिरपूरबांध, भर्रेगाव, सावली, पिंडकेपार. गोंदिया तालुका- चंगेरा, गुदमा, नवनगाव/खुर्द, पांजरा, पोवारीटोला, रापेवाडा, सहेशपूर, लोहारा, सतोना, लोधीटोला, मोगर्रा. गोरेगाव तालुका- दवडीपार, कलपाथरी, मुरदोली, पिंडकेपार, पुरगाव, शहारवाणी, सोनेगाव. सडक/अर्जुनी तालुका- घाटबोरी/तेली, घटेगाव, गिरोला, डव्वा, डोंगरगाव, कनेरी/राम, खजरी, कोहळीटोला, वडेगाव. सालेकसा तालुका- निंबा. तिरोडा तालुका- नवेगाव, डब्बेटोला, गुमाधावडा, खैरलांजी, कोडेलोहारा, मुरपाडी व खुरकुडी आदी गावांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.योजनेवर २१ कोटी रुपयांचा खर्चएकूण ४० गावांसाठी सुरु होणाºया या योजनेवर एकूण २१ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. लवकरच या ४० गावातील ग्रामस्थांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म योजनेतून काम पूर्ण झाल्यानंतर पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे संबंधित गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.