शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेले बालक अजूनही दिशाहीन

By admin | Updated: November 14, 2015 01:54 IST

शिक्षणाची वाट सोडून बालमजुरी करणारे बालक, भरकटलेले, अपहरण झालेल्या किंवा मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या बालकांची जिल्ह्यात अजूनही वाताहात होत आहे.

नरेश रहिले गोंदियाशिक्षणाची वाट सोडून बालमजुरी करणारे बालक, भरकटलेले, अपहरण झालेल्या किंवा मात्यापित्यांचे छत्र हरपलेल्या बालकांची जिल्ह्यात अजूनही वाताहात होत आहे. या बालकांचे संगोपन करणारे जिल्ह्यातील दोन बालसदन केंद्र व बालकामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या ४० बालसंक्रमण शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे निराधार बालकांचा जिल्ह्यात आधारच राहिलेला नाही. येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या उदासीनतेमुळे बालकांना आधार देण्यासाठी बालसदन केंद्र नाही.जिल्ह्यात तीन बालसदन केंद्र उघडण्यात आले होते. ज्या बालकांना संरक्षणाची गरज असते त्या बालकांना तिथे ठेवून त्यांचे संगोपन केले जाते. परंतु हे बालसदन केंद्र चालविणाऱ्या संस्थांकडून बालकांची योग्य देखरेख केली जात नसल्यामुळे तीनपैकी दोन बालसदन केंद्र बंद पाडण्यात आले आहेत. देवरी येथे फक्त एक बालसदन केंद्र सुरू असून तिथे २० च्या संख्येत बालकांची संख्या आहे. देवरी वगळता तिरोडा तालुक्याच्या नवेझरी येथील तर गोंदियाच्या कुंभारेनगरातील बालसदन केंद्र बंद करण्यात आले आहे. तेथील संस्था संस्थासंचालकांचा हलगर्जीपणा असल्यामुळे हे बाल सदन केंद्र बंद पाडण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातून बालमजूरी संपविण्यासाठी बालसंक्रमण ४० बाल संक्रमण शाळा तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्या शाळा २०१२ पासून बंद आहेत. चार वर्षापूर्वी गोंदियात १४७७ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता जिल्ह्यातील विविध भागांत ४० बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या शाळांत शिक्षण घेत असलेल्या बालकामगारांना अभ्यासाकरिता लागणारे साहित्य व अन्य गोष्टी देण्याकरिता प्रशासनाकडे नसल्यामुळे त्या बालसंक्रमण शाळा बंद करण्यात आल्या.परिणामी आता जिल्ह्यात बालमजूरांची संख्या ५००० च्या घरात आहे. शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत काही वर्षांपूर्वी इंदस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. या जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचादेखील समावेश होता. मात्र जिल्ह्यात ४० बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. बालमजुरी करणाऱ्या ९ ते १३ वर्षे वयोगटातील १४७७ बालकांना मजुरी करण्यास थांबवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू असताना याचे कंत्राट दोन संस्थाना देण्यात आले होते. तिरोडा तालुक्यात १०, देवरी ११, सडक/अर्जुनी दोन, अर्जुनी/मोरगाव दोन, आमगाव दोन, गोंदिया ११ व सालेकसा तालुक्यात दोन बालसंक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यासाठी १९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये ११९ शिक्षक, ४० महिला सहायक व लिपिकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पध्दतीने शासनाकडे पाठपुरावा करून बालसंक्रमण शाळा डॉ. अमित सैनी यांनी बंद पाडल्या. प्रबुद्ध विनायती कल्याणकारी संस्थेला ४० व प्रयास सामाजिक संस्था, भंडाराला २० शाळा देण्यात आल्या आहेत. त्या आता बंद झाल्या आहेत. मात्र हा प्रकल्प बंद पडल्याने जिल्ह्यात पाच हजाराच्या घरात बालकामगार धोक्याच्या ठिकाणी काम करीत आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाचे किंवा त्यांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष आहे. बाल मजूरांसाठी फक्त सरकारच्या पाच शाळा सुरू असल्याची माहिती आहे.सर्वेक्षण झालेच नाहीबालमजीरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सन २०१२ मध्ये जिल्हाधिकारी डॉ, अमित सैनी यांनी काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाठविले. परंतु ते कर्मचारी बाल संक्रमण शाळात गेल्यावर काही ठिकाणी बालके कमी आढळली. त्यांनी शहरात असलेल्या बालमजूरांचे सर्वेक्षण करायला हवे होते. कामगार कार्यालयाच्या सहकार्याने त्यांनी बालमजूरांचे सर्वेक्षण न करता बालमजूर नाहीत असा चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे जिल्ह्यातील बालसंक्रमण शाळा बंद पडल्या आहेत.