शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झेडपीचे ‘जिव्हाळ्यातून’ बालसंरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:29 IST

बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर भीतीपोटी बालके याची माहिती पालकांना देत नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्यातील भिती दूर करुन अशा घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने ‘जिव्हाळा’ उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देभयमुक्त वातावरणासाठी : जिल्ह्यातील १०६९ शाळांत वाटणार घडीपत्रिका

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर भीतीपोटी बालके याची माहिती पालकांना देत नसल्याची बाब पुढे आली. त्यांच्यातील भिती दूर करुन अशा घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी गोंदिया जि. प. शिक्षण विभागाने ‘जिव्हाळा’ उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहे.जिल्ह्यातील १०६९ शाळांत बाल संरक्षणासाठी ‘जिव्हाळा’ या बाल संरक्षण घडीपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे तसेच विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषणाचे प्रकार घडू नये, यासाठी सीईओ ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संरक्षण आणि जनजागृतीसाठी काय करायला हवे, काय करू नये, त्यासाठी असणारे कायदे यावर सविस्तर माहिती असलेले जिव्हाळा हे पत्रक प्रत्येक शाळेत पाठविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुुख व गटशिक्षणाधिकारी यांनी बाल संरक्षण धोरणाची अमंलबजावणी कशी करावी, या संदर्भात सूचना या घडी पत्रकेत देण्यात आली आहेत. कोणतेही विद्यार्थी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शारिरीक वा मानसिक शोषणाला बळी पडू नयेत, यासाठी शिक्षकांनी तत्पर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांमध्ये भयमुक्त वातावरण, निरामय आनंदी वातावरण, मुलांचे मनोधैर्य वाढविणे, बालसंरक्षीत वातावरण तयार करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.बाल संरक्षणासाठी असे दिले निर्देशबालकांचे संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती प्रशिक्षण व माहिती देणे, बाल हक्क आधारीत दृष्टीकोण तयार करणे, प्रतिबंधात्मक आणि सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून उपाय करणे, शाळेच्या आवारात मुख्य ठिकाणी संवाद पेटी बसविली जाणार आहे. शाळेच्या आवारात शाळा प्रमुखांचे संवाद वर्ग, शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी यांचे समुपदेशन मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत देणे, संदेशात्मक फलक, शाळेची परवनागी घेतल्याशिवाय स्वयंसेवी संघटनांनी शाळेत कार्यक्रम करू नये, शाळेत भेट देणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्राची सक्ती करावी, शाळेला भेट देणाºयांसाठी नोंदवही असावी. शाळेच्या आवारात सिसिटीव्ही कॅमेरे लावावे, शाळेला सुट्टी असेल त्यावेळी शाळा दुरूस्तीचे काम करावे अश्या सूचना दिल्या आहेत.प्रत्येक शाळेत सुरक्षा मंचकाही शाळांमध्ये मुलांवर अत्याचार होत असल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मुलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. मुलांच्या समस्येबाबत विविध समस्या शोधून काढणे, शाळा सुरक्षितता व सुरक्षा मंच स्थापन करण्यात येणार आहे. सुरक्षीत शाळा आराखडा तयार करावा लागणार आहे.