शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रभारीच्या भरवशावर

By admin | Updated: September 23, 2016 02:10 IST

शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली.

जि.प.ने लक्ष द्यावे : सर्वच कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवाबोंडगावदेवी : शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात येते. परंतु अर्जुनी मोरगाव येथील कार्यालय आजघडीला ‘प्रभारी अधिकाऱ्यावर’ दिवस काढत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी तद्वतच जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला अर्जुनी मोरगाव तालुक्याला सध्यातरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा प्रकर्षाणी जाणवत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आस्थापना असलेले बाल विकास प्रकल्प कार्यालय, बालवयातील मुलांचे आरोग्य तसेच पोषक आहार यासंबंधी मुख्यत्वेकरुन नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. सध्या या कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी मिळत नाही, हे एक तालुक्याचे दुर्भाग्यच म्हणावा लागेल. तालुक्यात आजघडीला नियमित सुरू असलेल्या २१४ अंगणवाड्या तर ८ मिनी अंगणवाड्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची मुले कार्यरत असलेल्या अंगणवाड्यामधून देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा लाभ घेतात. तसेच किशोरवयीन मुली, गरोदर माता यांचासुद्धा अंगणवाडी केंद्राशी नियमित संबंध येतो. अंगणवाडी केंद्रामधून ० ते ५ वयोगटातील मुलांचे शरीर, आरोग्य सुदृढ राहावे म्हणूच बचत गटाच्या माध्यामतून आहार पुरविल्या जातो. तो आहार किती दर्जेदार असतो, याकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सुतराम संबंध दिसून येत नाही, असे ठिक-ठिकाणी बोलल्या जाते. कार्यालयाला कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी मागील काही वर्षापासून शोधून सापडत नसल्याने कार्यालयातील इतर कर्मचारी स्व:मर्जीने वागत असल्याचे दिसून येत आहे. सदर कार्यालयातील प्रकल्प अधिकारी पदावर देवरी येथील तुषार पवनीकर यांनी ७ जुलै रोजी कार्यभार घेतला. येथील कार्यालयाचा कार्यभार हा अतिरिक्त पदभार असल्याचे सांगण्यात येत आहे. पवनीकर हे देवरी येथून आपल्या सोयीनुसार येथील कार्यालयात भेट देत असल्याचे समजते. त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांची साहेब आॅफीसला नसल्याने सैरावैरासारखी स्थिती कार्यालयात निर्माण झालेली दिसते. आज तालुक्यात काही ठिकाणी कार्यकर्तीच्या जागा रिक्त आहेत. मदतनिस जबाबदारी सांभाळत असल्याचे बोलल्या जाते.बालवयातील मुलांशी निगडीत असलेला तालुका आजघडीला अधिकाऱ्यांविना पोरका असताना जिल्हा परिषद मात्र शांत आहे. तालुक्यातील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कसे आहे, बालके मॅम, सॅम अवस्थेपर्यंत जात आहेत का? याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. काही कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या पोषण आहार देवून अंगणवाडी केंद्र बंद करतात. बालकांना सुसंस्कार देण्यासाठी सवड मिळत नाही, असा प्रकार सुरू असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.एकंदरीत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा गॉडफॉदर नियमित कार्यालयात दिसणार नाही तर तालुक्यातील २२२ अंगणवाडी केंद्राची कोणती अवस्था राहणार यांचा जि.प. प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)