शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत किती विकास कामे केली मुख्यमंत्र्यांनी सांगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:05 IST

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल । आघाडी करुन लढल्यास दोन्ही पक्षाला फायदा, पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.मागील पाच वर्षांत जिल्हा विकासात पूर्णपणे माघारल्याचा आरोप खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.स्थानिक नमाद विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या कायम आहेत.तर सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने धानाला प्रती क्विंटल ४ हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच या आश्वासनाचा सुध्दा सरकारला विसर पडला असून धानाला केवळ ५०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची छळणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले असून नीतीमत्ता आणि प्रतिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे.रेतीमाफीया, कंत्राटदार यांना स्थान देऊन राजकारण गढूळ केले जात आहे. त्यामुळे जनतेलाच आता याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मागील पाच वर्षांत सांगता येण्यासारखे एकही ठोस विकास विद्यमान सरकारने केले नाही.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना सुध्दा त्याचे उदाहरण देता आले नसल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.काँग्रेस-रॉष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणारआगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार यात कुठलेही दुमत नाही. जागा वाटपाची प्रक्रिया सुध्दा लवकरच होणार आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात किती जागा राष्ट्रवादी आणि किती जागा काँग्रेसने लढव्यात यासाठी आपण पुढाकार घेवून त्यावर मार्ग काढू.या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढल्यास निश्चितच त्याचा फायदा होईल यात शंका नाही असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.कलम ३७० हटविण्याचे श्रेय घेऊ नयेजम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटविण्याला आमच्या पक्षाचा कधीच विरोध नव्हता. मात्र सत्तारुढ पक्षाकडून विरोध असल्याचे सांगितले जात आहे.भारताच्या संविधानात कलम ३७० तरतूद डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी केली होती. केंद्र सरकारने केवळ संविधानातील तरतूदीची अंमलबजावणी केली.त्यामुळे त्याचे श्रेय कुणीही घेण्याची गरज नसल्याचे खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल