शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

पाच वर्षांत किती विकास कामे केली मुख्यमंत्र्यांनी सांगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:05 IST

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल । आघाडी करुन लढल्यास दोन्ही पक्षाला फायदा, पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जिल्ह्यात येऊ गेले. मात्र ते जिल्ह्यासाठी काहीच देऊन गेले नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात कोणती मोठी विकास कामे केली आणि किती रोजगार निर्मिती केली हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे.मागील पाच वर्षांत जिल्हा विकासात पूर्णपणे माघारल्याचा आरोप खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.स्थानिक नमाद विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला माजी आ.राजेंद्र जैन उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या कायम आहेत.तर सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने धानाला प्रती क्विंटल ४ हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर येताच या आश्वासनाचा सुध्दा सरकारला विसर पडला असून धानाला केवळ ५०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची छळणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले असून नीतीमत्ता आणि प्रतिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे.रेतीमाफीया, कंत्राटदार यांना स्थान देऊन राजकारण गढूळ केले जात आहे. त्यामुळे जनतेलाच आता याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागणार असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. मागील पाच वर्षांत सांगता येण्यासारखे एकही ठोस विकास विद्यमान सरकारने केले नाही.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना सुध्दा त्याचे उदाहरण देता आले नसल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला.काँग्रेस-रॉष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणारआगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार यात कुठलेही दुमत नाही. जागा वाटपाची प्रक्रिया सुध्दा लवकरच होणार आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात किती जागा राष्ट्रवादी आणि किती जागा काँग्रेसने लढव्यात यासाठी आपण पुढाकार घेवून त्यावर मार्ग काढू.या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढल्यास निश्चितच त्याचा फायदा होईल यात शंका नाही असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.कलम ३७० हटविण्याचे श्रेय घेऊ नयेजम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटविण्याला आमच्या पक्षाचा कधीच विरोध नव्हता. मात्र सत्तारुढ पक्षाकडून विरोध असल्याचे सांगितले जात आहे.भारताच्या संविधानात कलम ३७० तरतूद डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी केली होती. केंद्र सरकारने केवळ संविधानातील तरतूदीची अंमलबजावणी केली.त्यामुळे त्याचे श्रेय कुणीही घेण्याची गरज नसल्याचे खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल