शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

छत्तीसगड राज्याप्रमाणे धानाला भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:06 IST

सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला. लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र महाराष्ट्रात अद्यापही १७५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही छत्तीसगड प्रमाणेच धानाला २५०० हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सहषराम कोरोटे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला. लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र महाराष्ट्रात अद्यापही १७५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही छत्तीसगड प्रमाणेच धानाला २५०० हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सहषराम कोरोटे यांनी केली आहे.सतत पडणाऱ्या ओला व कोरडा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे सरकार शेतकऱ्यांचे पालक असते . शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान तेथील जनता व शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली.छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर १० तासांच्या आत धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्याची घोषणा करुन त्याची अंमलबजावणी केली.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शेतकºयांच्या धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव राज्य सरकारने द्यावा.ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत धान खरेदी केंद्रावर १७५० रुपये दराने धान विकले अशा सर्व शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे ७५० रुपये बोनसच्या रुपात देण्यात यावे. केवळ खोटी आश्वासने देऊन सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये.सरकारने शेतकऱ्यांच्या भावनाचा आदर करुन धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अन्यथा या विरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे. तसेच आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.