शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:26 IST

तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात.

ठळक मुद्देशासकीय आधारभूत केंद्र : शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात. मात्र धान विकून एक महिना ओलांडला तरी सुद्धा धानाचा चुकारा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्वरित चुकारा मिळाला नाही आंदोलन छेडण्याच्या तसेच तहसील कार्यालय येथे उपोषण करण्याच्या इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी येथील पांडव सहकारी संस्थेच्यावतीने नवेझरी व विर्सी येथे आधारभूत केंद्र चालविले जातात. वडेगाव येथील नेहरु भात गिरणी सहकारी संस्थेच्यावतीने वडेगाव शेतकरी साधन सहकारी संस्था बघोलीच्यावतीने परसवाडा, तिरोडा सहकारी संस्थेच्यावतीने तिरोडा येथे सूर्यवंशी सहकारी संस्था तेढा तसेच भिवापूर, चिखली अशा नऊ केंद्रावर शेतकºयांची धान खरेदी मागील महिन्यापासून सुरु आहे. मात्र शेतकºयांना एक महिन्यापासून धानाचा चुकारा अजूनही मिळाला नाही.शेतकºयांना यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून धानाचा चुकारा देण्याची सोय होती. ती व्यवस्था शेतकरी हिताची होती. त्यावेळी धान्य खरेदी संस्थेच्या माध्यमातून केल्यानंतर त्यांची हुडी तयार करुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी याची स्वाक्षरी घेवून जिल्हा बँकेत बिल सादर केले जात. त्यानंतर मुंबई मार्केटिंग फेडरेशन महाराष्टÑ शासनाच्या तिजोरीतून रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली जात होती. संस्थेच्यावतीने धनादेशाच्या माध्यमातून शेतकºयांना रक्कम वितरीत केली जात होती व या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना चुकारा लवकर मिळत असे.परंतु सध्या आॅनलाईन धान खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे धानाचा चुकारा सुद्धा आॅनलाईन शेतकºयांच्या खात्यात थेट जमा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांचा चुकारा फक्त एकाच ठिकाणावर होणार. तर लाखो शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा कसा मिळणार आणि उशिर तर नक्की होणारच.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नाही. त्वरित शेतकºयांचा चुकारा मिळाला नाही तर आंदोलन छेडून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष भांडारकर यांनी दिला आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे असे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांची मागणी आहे.