शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताचे दर आवाक्याबाहेर

By admin | Updated: June 23, 2014 23:58 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च

रावणवाडी : धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च कमी करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याच्या पर्याय म्हणून शेण खताच्या वापरावर ते जास्त भर देताना दिसून येत आहेत.भरघोस उप्तन्नासाठी शेतकरी आजही शेण खताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असणारे सेंद्रिय घटक शेतातच असतात. त्यामुळे शेण खताची मागणी वाढली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या रासायनिक खताचे दर गगणाला भिडले आहेत. या खताचा उपयोग शेतकऱ्यांच्या बजेट बाहेर जात आहे. ग्रामीण भागात पाळीव जनावराची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेण खत मिळणे दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या काळात शेताला शेणखत भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून शेतकरी गाई म्हशी व शेळ्या पाळायचे. मात्र आता चारा-पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांची निगा राखणे शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आज यांत्रिकी शेतीकडे वळला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना मशागतीकरिता कित्येक दिवस लागायचे. मात्र आता ही मशागत यांत्रिकी पद्धतीने काही तासातच पूर्ण होते. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांची विक्री केली. आता मोजकीच जनावरे शेतकरी बाळगत आहेत. त्यामुळे शेणखताचे उत्पन्न कमी होवून भाव वाढले आहेत. सेंद्रीय शेती करण्यासाठी शेणखताला अनन्यसाधारण महत्व आहे. मध्यंतरीच्या काळात शेतात रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केला जात होता. त्यामुळे जमिनीचे पोत बिघडले. आता त्यात सुधारणेसाठी पुन्हा शेतकरी शेणखताचा वापर करु लागले आहेत. त्यामुळेच आता शेणखताची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कृषीचे चक्र हे पशूंशी निगडीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात हरितक्रांतीने नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखाली परंपरागत पद्धतीला छेद दिला. काही वर्ष रासायनिक खताच्या मदतीने बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले. मात्र जमिनीची सुपीकता धोक्यात आल्याने आता पुन्हा उत्पादकांना शेणखताची आठवण होत आहे. (वार्ताहर)पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची गरजरावणवाडी : मानवी जीवन व पर्यावरणाचे अनन्यसाधारण संबंध आहे. पर्यावरणाशिवाय मानवी जीवनात संपन्नता येवू शकत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जीवनाचा नाश अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना करणे आवशक आहे.जीवनसृष्टीचा आधारस्तंभ पर्यावरण आहे. अनेक उपद्रवी कृत्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास येते. मात्र यावर आळा घालण्यासाठी कसलीही उपाययोजना केली जात नाही. वनातील वृक्ष हेच मानवाचे नातलग आहेत, असा मंत्र संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दिला. त्यामुळे आधुनिक काळात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून त्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी जिथे घनदाट अरण्ये होती, तिथे आता वृक्ष विरळ होवून लोकवस्ती वसलेली आहे. मानवी जीवन वृक्षांवर अवलंबून आहे, हे मानवाला कळत असूनही त्यांना वळत नाही. त्यामुळेच वृक्षतोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. (वार्ताहर)