शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

रासायनिक खताचे दर आवाक्याबाहेर

By admin | Updated: June 23, 2014 23:58 IST

धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च

रावणवाडी : धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च कमी करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याच्या पर्याय म्हणून शेण खताच्या वापरावर ते जास्त भर देताना दिसून येत आहेत.भरघोस उप्तन्नासाठी शेतकरी आजही शेण खताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असणारे सेंद्रिय घटक शेतातच असतात. त्यामुळे शेण खताची मागणी वाढली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या रासायनिक खताचे दर गगणाला भिडले आहेत. या खताचा उपयोग शेतकऱ्यांच्या बजेट बाहेर जात आहे. ग्रामीण भागात पाळीव जनावराची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेण खत मिळणे दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या काळात शेताला शेणखत भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून शेतकरी गाई म्हशी व शेळ्या पाळायचे. मात्र आता चारा-पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांची निगा राखणे शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आज यांत्रिकी शेतीकडे वळला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना मशागतीकरिता कित्येक दिवस लागायचे. मात्र आता ही मशागत यांत्रिकी पद्धतीने काही तासातच पूर्ण होते. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांची विक्री केली. आता मोजकीच जनावरे शेतकरी बाळगत आहेत. त्यामुळे शेणखताचे उत्पन्न कमी होवून भाव वाढले आहेत. सेंद्रीय शेती करण्यासाठी शेणखताला अनन्यसाधारण महत्व आहे. मध्यंतरीच्या काळात शेतात रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केला जात होता. त्यामुळे जमिनीचे पोत बिघडले. आता त्यात सुधारणेसाठी पुन्हा शेतकरी शेणखताचा वापर करु लागले आहेत. त्यामुळेच आता शेणखताची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कृषीचे चक्र हे पशूंशी निगडीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात हरितक्रांतीने नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखाली परंपरागत पद्धतीला छेद दिला. काही वर्ष रासायनिक खताच्या मदतीने बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले. मात्र जमिनीची सुपीकता धोक्यात आल्याने आता पुन्हा उत्पादकांना शेणखताची आठवण होत आहे. (वार्ताहर)पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची गरजरावणवाडी : मानवी जीवन व पर्यावरणाचे अनन्यसाधारण संबंध आहे. पर्यावरणाशिवाय मानवी जीवनात संपन्नता येवू शकत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जीवनाचा नाश अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना करणे आवशक आहे.जीवनसृष्टीचा आधारस्तंभ पर्यावरण आहे. अनेक उपद्रवी कृत्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास येते. मात्र यावर आळा घालण्यासाठी कसलीही उपाययोजना केली जात नाही. वनातील वृक्ष हेच मानवाचे नातलग आहेत, असा मंत्र संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दिला. त्यामुळे आधुनिक काळात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून त्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी जिथे घनदाट अरण्ये होती, तिथे आता वृक्ष विरळ होवून लोकवस्ती वसलेली आहे. मानवी जीवन वृक्षांवर अवलंबून आहे, हे मानवाला कळत असूनही त्यांना वळत नाही. त्यामुळेच वृक्षतोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. (वार्ताहर)