शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

दावा नाकारणार्‍या विमा कंपनीला चपराक

By admin | Updated: June 9, 2014 23:41 IST

शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.

गोंदिया : शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या आयसीआयसीआय  लोंबार्ड कंपनीला ग्राहक मंचाने संबंधित मृत शेतकर्‍याच्या वारसांना विम्याचा लाभ देण्याचा आदेश दिला.तालुक्यातील महारिटोला येथे उमराव पंधरे यांची पत्नी रैनाबाई पंधरे यांचा १५ नोव्हेंबर २00५ रोजी पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. हा त्यांचा अपघाती मृत्यू असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी अपघआत विमा योजनेनुसार, आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडे १ लाख रुपये मिळण्यासाठी सर्व कागदपत्र सुपूर्त केले. परंतु विमा कंपनीने तो दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याचे त्यांना कळविले नाही. त्यामुळे मृत महिलेचा मती गजानन पंधरे यांनी विम्याचे एक लाख रुपये द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह व झालेल्या त्रासाचे १0 हजार आणि आतापर्यंत आलेल्या खर्चाचे १0 हजार मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे धाव घेतली.विमा कंपनीने आपली बाजू स्पष्ट करताना घडलेल्या घटनेचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे तक्रारकर्त्यांचा हा विमा प्रलंबित ठेवण्यात आल्याचे सांगितले. परंतु तक्रारकर्त्यांचे वकील अँड.उदय क्षीरसागर यांनी मंचापुढे आपली बाजू मांडताना तक्रारकर्त्यांच्या पत्नीचा मृत्यू हा पुराच्या पाण्यात बुडूनच झाला हे सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावर तक्रारकर्ता व विरोधी पक्षाची बाजू ऐकूण घेत न्यायमंचाने तक्रारकर्त्यांस शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेंतर्गत एक लाख रुपये व तक्रार केल्याच्या दिनांकापासून ते आतापर्यंत संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. १0 टक्के दराने द्यावे, एवढेच नव्हे तर झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये व आतापर्यंत झालेला खर्च तीन हजार रुपये हे सर्व आदेश दिल्यापासूनच्या ३0 दिवसात देण्यास सांगितले. यामुळे मृत शेतकर्‍याच्या वारसांना दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)