शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वातावरणातील बदलाने पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST

तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली

काचेवानी : तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली असून रोग व किडींच्या प्रादुर्भावाने ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यात एकूण ३२ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र धान्य लागवडीखाली आहे. तूर, भाजीपाला व केळी वगळता ३० हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. सन २०१४-१५ च्या रबी हंगामात तृणधान्य गहू ४०७.८० हेक्टर क्षेत्रात, कडधान्य हरभरा ९५७.८० हेक्टरमध्ये, लाखोळी तीन हजार ६१० हेक्टरमध्ये, पोपट १९१ हेक्टरमध्ये, जवस एक हजार ८२१ हेक्टरमध्ये, मोहरी व इतर ७.८० हेक्टरमध्ये तर भाजीपाला २४०.४० हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. तालुक्यात रबी हंगामात ७२३५.८० हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेतले जात आहेत. मात्र सतत १५ ते २० दिवसांच्या अंतराने होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.सध्यस्थितीत तिरोडा तालुक्यात तुरीच्या शेंगा लागल्या असून त्या दाना भरण्याच्या मार्गावर असतानाच ढगाळ वातावरणाने त्यांच्यावर किडीचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.सध्या रबी हंगामातील कडधान्य व तृणधान्य रोपट्या अवस्थेत आहे. त्यामुळे कीड किंवा रोगाची समस्या उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळविले जावू शकते. परंतु अशीच समस्या राहील तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हरभऱ्यावरील घाटेअळी, गव्हावरील तांबेरा रोग अतिशय विनाशकारी असल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी कळविले आहे. (वार्ताहर)