शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

वातावरणातील बदलाने पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: January 11, 2015 22:54 IST

तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली

काचेवानी : तिरोडा तालुक्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात ढगाळलेले वातावरण व अवकाळी पावसाने तृणधान्य, कडधान्यासह तूर व भाजीपाल्याचे पीक उद्वस्त झाले आहे. सध्या पिकांची अवस्था दयनिय झाली असून रोग व किडींच्या प्रादुर्भावाने ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यात एकूण ३२ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र धान्य लागवडीखाली आहे. तूर, भाजीपाला व केळी वगळता ३० हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. सन २०१४-१५ च्या रबी हंगामात तृणधान्य गहू ४०७.८० हेक्टर क्षेत्रात, कडधान्य हरभरा ९५७.८० हेक्टरमध्ये, लाखोळी तीन हजार ६१० हेक्टरमध्ये, पोपट १९१ हेक्टरमध्ये, जवस एक हजार ८२१ हेक्टरमध्ये, मोहरी व इतर ७.८० हेक्टरमध्ये तर भाजीपाला २४०.४० हेक्टर क्षेत्रात घेण्यात येत आहे. तालुक्यात रबी हंगामात ७२३५.८० हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेतले जात आहेत. मात्र सतत १५ ते २० दिवसांच्या अंतराने होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे.सध्यस्थितीत तिरोडा तालुक्यात तुरीच्या शेंगा लागल्या असून त्या दाना भरण्याच्या मार्गावर असतानाच ढगाळ वातावरणाने त्यांच्यावर किडीचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.सध्या रबी हंगामातील कडधान्य व तृणधान्य रोपट्या अवस्थेत आहे. त्यामुळे कीड किंवा रोगाची समस्या उद्भवली तरी त्यावर नियंत्रण मिळविले जावू शकते. परंतु अशीच समस्या राहील तर शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हरभऱ्यावरील घाटेअळी, गव्हावरील तांबेरा रोग अतिशय विनाशकारी असल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी कळविले आहे. (वार्ताहर)