शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

रेल्वेगाडी वेळापत्रकात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:26 IST

अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे. तालुक्याशी रेल्वेमार्ग जुडलेला आहे. मात्र रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कार्यालयीन कामकाजासंदर्भात जुळत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. या वेळापत्रकात बदल करण्याची जनतेची मागणी आहे.गोंदिया-बल्लारशा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. (५८८०२) ही गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सकाळी ७.३० वाजता सुटत होती. मात्र ही गाडी डिझेल इंजिनऐवजी विद्युतीकरणावर गोंदिया ते नागभिडपर्यंत परिवर्तीत झाली. नागभिड येथे पुन्हा डिझेल इंजिन लावला जातो. यासाठी अर्धातास विलंब होत असल्याने गोंदिया येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी रेल्वेगाडी ७ वाजता करण्यात आल्याचे समजते. विद्युतीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही ट्रेन पूर्ववत सकाळी ७.३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सोडण्याची मागणी आहे.बल्लारशा येथून गोंदियाकडे परतीच्यावेळी (५८८०१) बल्लारशा-गोंदिया ही गाडी नेहमीच उशीरा सोडली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही गाडी बल्लारशाऐवजी चांदाफोर्ट स्थानकावरुन सोडल्यास वेळ नियंत्रित केली जाऊ शकते. ही गाडी गोंदिया स्थानकाच्या आऊटरवर सुमारे तासभर थांबते. याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार झाली आहे. या रेल्वे गाडीचे हिरडामाली स्थानकावरुन सायंकाळी ७.१६ वाजता प्रस्थान वेळ आहे व गोंदिया येथे पोहोचण्याची वेळ रात्री ८.३० वाजताची आहे. हिरडामाली ते गोंदिया हे केवळ १२ किमीचे अंतर कापण्यासाठी १ तास १४ मिनिटांचा कालावधी कसा? हा प्रश्न अन्नुत्तरित आहे. बल्लारशा-गोंदिया (५८८०३) रेल्वेगाडी बल्लारशा येथून सकाळी ५.३० वाजता सुटते. ही गाडी साधारणत: गोंदिया येथे ११.३० वाजता पोहोचते.कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे लोक तसेच कर्मचारी, विद्यार्थी व व्यापाºयांना ही वेळ गैरसोयीची ठरते. याऐवजी १०.३० वाजता गोंदिया येथे पोहोचल्यास सर्वांना सोईचे होईल. या वेळेवर ही गाडी पोहोचल्यास बालाघाटकडे जाणाºया प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकावरुन उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी व रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशी, विद्यार्थी, व्यापारी व दैनंदिन ये-जा करणाºया कर्मचाºयांनी केली आहे.