शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

शेतीच्या नुकसानभरपाईचा मापदंडच बदलवावा

By admin | Updated: June 25, 2015 00:44 IST

खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे.

बागायतदारांची भावना : भरपाई मिळणे कठीणआमगाव : खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे बागायती शेतीमधील पिकांच्या नुकसानभरपाईचा मापदंड अयोग्य असल्याने बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वळद येथील बागायतदार शेतकरी किशोर रहांगडाले यांच्या १४ एकर शेतात बागायती शेतीमधील आंब्याचे, फणसाचे व चिकूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागातर्फे बागायत शेतीच्या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याकरिता सध्या कार्यरत तहसीलदार, खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्वत: बागायत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली, मात्र १२ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्यात आली. या अगोदर दोन वर्षापूर्वी बागायती शेतीच्या नुकसानभरपाई हेक्टर २५ हजार रुपये देण्यात आले होते. ही पध्दत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांची बागायत शेतीचे जेवढे नुकसान झाले तेवढे मिळत नाही. यावर्षी सुध्दा मागील शासनाच्या निकषाप्रमाणे हेक्टरी २५ हजार देणे गरजेचे होते, अशी भावना रहांगडाले यांनी व्यक्त केली. आता सततच्या पाण्यामुळे व सोसायट्याच्या वाऱ्यामुळे तपासणीनंतर सुध्दा आंबे, चिकूचे खूप नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला किंवा तपासणी करण्यात आली नाही. जवळपास एक महिन्यात आंबे व चिकूचे एक ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.तसेच आता विविध जातीचे आंब्याचे रोपटे विक्रीस तयार असून त्यावर सुध्दा परिणाम झाला आहे. पाणी आंब्यावर व चिकूवर गेल्याने योग्य भाव मिळाला नाही. अशीच अवस्था संपूर्ण बागायतदार शेतकऱ्यांची आहे. नुकसान भरपाईचा मापदंड योग्यरित्या झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यात व्यापक रोष असल्याची प्रतिक्रिया शेतीनिष्ठ शेतकरी किशोर रहांगडाले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)