शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

गोंदिया : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकारच जबाबदार असून, आता मात्र आंदाेलन करून भाजप जनतेची दिशाभूल ...

गोंदिया : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केवळ केंद्र सरकारच जबाबदार असून, आता मात्र आंदाेलन करून भाजप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी (दि. २५) शहरातील जयस्तंभ चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग या सदराखाली अनु. जाती जमाती व्यतिरिक्त इतर मागासवर्गीयांना आरक्षण दिले जात होते. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रतिनिधित्व करण्याची संधी चालत आलेली होती. परंतु, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ना. मा. प्र.चे म्हणजेच ओबीसींचे आरक्षण रद्द ठरविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून ओबीसींची लोकसंख्या, मागासलेपण व प्रतिनिधित्व याबद्दलचा इंपिरिकल डाटा मागितला होता. परंतु, तो केंद्र सरकारकडे असूनदेखील सादर करण्यात आला नाही. त्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले.

यास सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जवाबदार असल्याचा आरोप केला. हा निषेध गोंदिया शहर काँग्रेस कमिटी, गोंदिया तालुका काँग्रेस कमिटी, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी काँग्रेस, किसान काँग्रेस, अनु. जाती विभाग, अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आला. शहीद भोला काँग्रेस भवन येथे प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शहीद भोला काँग्रेस भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मार्च काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, जहीरभाई अहमद, सूर्यप्रकाश भगत, आलोक मोहंती, हरीष तुळसकर, अशोक गुप्ता, जितेंद्र कटरे, जीतेश राणे, नीलम हलमारे, योगेश अग्रवाल, बाबा मिश्रा, राजकुमार पटेल, रेखा बानेवार, आशिष नागपुरे, डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे, आशिष रहांगडाले, सचिन मेश्राम, वंदना काळे यांनी केले, तर तिरोडा येथे माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.