शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

महागाई वाढली दहापट अन् रोहयोच्या मजुरीत वाढ केवळ आठ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 14:27 IST

केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून मजुरांची थट्टा १०० दिवस कामाचे आश्वासन फोल

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई दहापट वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. महागाई आकाशाला भिडलेली असताना केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरीत केवळ ८ रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, एप्रिलपासून मजुरांना २५६ रुपये मजुरी मिळणार आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरु केली. मजुरांना होणारे फायदे लक्षात घेता, ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.

या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतात. मजुरीची रक्कम लाभार्थी व मजुरांच्या बँक खात्यात जमा होते. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळावे व सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी रोहयो अंतर्गत विविध योजना गाव पातळीवर राबविल्या जातात. माती नाला, बांध यासारखी कष्टाची कामे मजुराला करावी लागतात.

जिल्ह्यात ३ हजार कामे सुरु

२०२१-२२ या वर्षात २४८ रुपये मजुरी मिळत होती. आता त्यात आठ रुपयांनी वाढ केल्याने २५६ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ३ हजारांच्यावर कामे सुरु आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरीत गेल्यावर्षी अत्यल्प वाढ करण्यात आली होती. यंदा राज्यातील दुष्काळी स्थिती, वाढत्या महागाईचा विचार होऊन मजुरीत वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र, केवळ आठ रुपयांची वाढ करून सरकारने मजुरांची थट्टा केली आहे.

- हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष, आयटक

टॅग्स :LabourकामगारGovernmentसरकार