शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

महागाई वाढली दहापट अन् रोहयोच्या मजुरीत वाढ केवळ आठ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 14:27 IST

केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून मजुरांची थट्टा १०० दिवस कामाचे आश्वासन फोल

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई दहापट वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. महागाई आकाशाला भिडलेली असताना केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरीत केवळ ८ रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, एप्रिलपासून मजुरांना २५६ रुपये मजुरी मिळणार आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरु केली. मजुरांना होणारे फायदे लक्षात घेता, ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.

या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतात. मजुरीची रक्कम लाभार्थी व मजुरांच्या बँक खात्यात जमा होते. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळावे व सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी रोहयो अंतर्गत विविध योजना गाव पातळीवर राबविल्या जातात. माती नाला, बांध यासारखी कष्टाची कामे मजुराला करावी लागतात.

जिल्ह्यात ३ हजार कामे सुरु

२०२१-२२ या वर्षात २४८ रुपये मजुरी मिळत होती. आता त्यात आठ रुपयांनी वाढ केल्याने २५६ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ३ हजारांच्यावर कामे सुरु आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरीत गेल्यावर्षी अत्यल्प वाढ करण्यात आली होती. यंदा राज्यातील दुष्काळी स्थिती, वाढत्या महागाईचा विचार होऊन मजुरीत वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र, केवळ आठ रुपयांची वाढ करून सरकारने मजुरांची थट्टा केली आहे.

- हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष, आयटक

टॅग्स :LabourकामगारGovernmentसरकार