शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

महागाई वाढली दहापट अन् रोहयोच्या मजुरीत वाढ केवळ आठ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 14:27 IST

केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून मजुरांची थट्टा १०० दिवस कामाचे आश्वासन फोल

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई दहापट वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. महागाई आकाशाला भिडलेली असताना केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.

रोजगार हमी योजनेच्या मजुरीत केवळ ८ रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, एप्रिलपासून मजुरांना २५६ रुपये मजुरी मिळणार आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरु केली. मजुरांना होणारे फायदे लक्षात घेता, ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.

या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतात. मजुरीची रक्कम लाभार्थी व मजुरांच्या बँक खात्यात जमा होते. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळावे व सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी रोहयो अंतर्गत विविध योजना गाव पातळीवर राबविल्या जातात. माती नाला, बांध यासारखी कष्टाची कामे मजुराला करावी लागतात.

जिल्ह्यात ३ हजार कामे सुरु

२०२१-२२ या वर्षात २४८ रुपये मजुरी मिळत होती. आता त्यात आठ रुपयांनी वाढ केल्याने २५६ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ३ हजारांच्यावर कामे सुरु आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरीत गेल्यावर्षी अत्यल्प वाढ करण्यात आली होती. यंदा राज्यातील दुष्काळी स्थिती, वाढत्या महागाईचा विचार होऊन मजुरीत वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र, केवळ आठ रुपयांची वाढ करून सरकारने मजुरांची थट्टा केली आहे.

- हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष, आयटक

टॅग्स :LabourकामगारGovernmentसरकार