शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:35 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, ...

ठळक मुद्देलिंक फेलची समस्या : अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, तहसील आणि उपविभागीय कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळल्याचे चित्र होते.जिल्ह्यातील ३४७ सरपंच आणि २ हजार ९३९ सदस्य पदांसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने यावर्षीपासून नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच सहा दिवसांत केवळ २१० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारपासून नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे चित्र होते.गुरूवारी सर्व केंद्रांवर सरपंच पदासाठी २२७ तर सदस्य पदासाठी ९७० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. तर शुक्रवारी सकाळी १० वाजतापासूनच जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी गर्दी केली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती उमेदवारांनी शुक्रवारी नामाकंन अर्ज दाखल केले याची माहिती कळू शकली नाही.अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यताग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. भारनियमन, लिंक फेलमुळे अर्ज भरण्यास फार विलंब झाला. नामाकंन अर्ज दाखल करणाºया उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र लिंक फेलच्या समस्येमुळे अनेक उमेदवार नामाकंन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिल्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागात भारनियमन सुरुचजिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. याचा फटका आॅनलाईन नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला बसला. शुुक्रवार नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधित भारनियमन असल्याने नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. निवडणुकीच्या कालावधित भारनियमन बंद करण्याच्या मागणीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.