शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:35 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, ...

ठळक मुद्देलिंक फेलची समस्या : अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, तहसील आणि उपविभागीय कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळल्याचे चित्र होते.जिल्ह्यातील ३४७ सरपंच आणि २ हजार ९३९ सदस्य पदांसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने यावर्षीपासून नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच सहा दिवसांत केवळ २१० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारपासून नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे चित्र होते.गुरूवारी सर्व केंद्रांवर सरपंच पदासाठी २२७ तर सदस्य पदासाठी ९७० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. तर शुक्रवारी सकाळी १० वाजतापासूनच जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी गर्दी केली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती उमेदवारांनी शुक्रवारी नामाकंन अर्ज दाखल केले याची माहिती कळू शकली नाही.अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यताग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. भारनियमन, लिंक फेलमुळे अर्ज भरण्यास फार विलंब झाला. नामाकंन अर्ज दाखल करणाºया उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र लिंक फेलच्या समस्येमुळे अनेक उमेदवार नामाकंन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिल्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागात भारनियमन सुरुचजिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. याचा फटका आॅनलाईन नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला बसला. शुुक्रवार नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधित भारनियमन असल्याने नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. निवडणुकीच्या कालावधित भारनियमन बंद करण्याच्या मागणीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.