शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शहर येणार सीसीटीव्हींच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:04 IST

शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य भागांत सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील ४० जागांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. पोलीस मुख्यालयात यासाठी कंट्रोल रूम तयार केले जाणार असून पोलिसांची या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.

ठळक मुद्देशहरातील ४० जागांवर लागणार सीसीटीव्ही : २.३० कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य भागांत सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील ४० जागांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. पोलीस मुख्यालयात यासाठी कंट्रोल रूम तयार केले जाणार असून पोलिसांची या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.काही वर्षांपूर्वी शहरातील सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला होता व त्यात दुकान संचालकांवर गोळी झाडण्यात आली होती. याशिवाय सराफा दुकानाच्या चौकीदाराचा खून करण्यात आल्याची घटनाही शहरात घडली आहे. याशिवाय अन्य गुन्हेगारी कारवाया शहरात नित्याच्याच झाल्या आहेत. शहरातील या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी सीसीटीव्ही लावणे अत्यंत आवश्यक झाले होते. यामुळे आमदार गोपालदास अग्रवाल जिल्हा नियोजन समितीकडे शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती.तसेच यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटींचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र पोलीस विभागाकडून वेळेत निधी खर्च करण्यात आली नाही. परिणामी सन २०१४ पासून हा निधी पोलीस विभागाकडे जमा होता. शहरात सीसीटीव्ही लावणे अत्यंत गरजेचे झाले असल्याने आमदार अग्रवाल यांनी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळवून घेतली. त्यामुळे आता शहरात सीसीटिव्ही लावण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे.शहरातील ४० जागांवर ९० सीसीटिव्ही लावले जाणार असून यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयात या सीसीटीव्हींचे कंट्रोल रूम तयार केले जात असून तेथे बसून अधिकारी शहरातील हालचालींवर नजर ठेवणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट पोलीस अधिकाऱ्यांची नजर राहणार असल्याने नक्कीच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.चार मुख्य चौकांत ट्राफिक सिग्नलगुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा प्रयोग केला जात असतानाच शहरातील वाढती व विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहरात चार मुख्य चौकांत ट्राफिक सिग्नल लावले जाणार आहेत. यात, जिल्हा परिषद चौक, फुलचूर नाका, पोलीस मुख्यालय चौक व बायपास रिंग रोड चौकात (बालाघाट रोड) हे ट्राफिक सिग्नल लावले जाणार आहेत. शहरातील हे मुख्य व अत्यंत वर्दळीचे मार्ग असून येथे कित्येक अपघात घडले आहेत. ट्राफिक सिग्नल लावल्याने अपघातांच्या घटना नियंत्रणात येणार आहेत.