शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

आमगावकरांच्या घशाला पडली कोरड

By admin | Updated: March 26, 2016 01:41 IST

आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील ...

पाणी पुरवठा बंद : पर्यायी व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षआमगाव : आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील पर्यायी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून आमगावकरांच्या घशाला कोरड पडली आहे.आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता ही योजना कालबाह्य ठरली होती. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंज़ुर करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करताना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताकडे योग्य लक्ष देण्यात आले नाही. प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना घाईघाईने कार्यान्वित करुन घेतली. आमगाव येथे नदी पात्रातून असलेल्या सिंचन विहिरींच्या माध्यमाने साठवण करुन पाण्याची उपलब्धता करण्यात येत होती. या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने पाणी साठवणुकीसाठी नदीपात्रात मोठ््या धरणाची आवश्यकता आहे. पाणी साठवण करण्याकरिता नवीन विहिरींची गरज आहे. या मुलभूत बाबीकडे दुर्लक्ष झाले. उलट बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची पूर्तता भागविण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याच्या मागणीतील वाढ लक्षात घेता बनगाव प्रादेशिक पुरवठा योजनेतील पाणी, मागणीवरील खर्च भागत नसल्याने प्रशासकांनी पाणी पुरवठा बंद केला व पूर्ववत नदी पात्रातील साठवणुकीतील पाण्याने नागरिकांची तहानभागविण्यात आली. परंतु नदीपात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथे मागील चार दिवसांपासून खंडीत पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)नदीपात्रात धरण बांधकाम व्हावेनदीपात्रातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला सक्षम करण्यासाठी नदीपात्रात धरणाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील पाणी साठवणमुळे या भागात सिंचन वाढेल. तसेच नवीन विहीर बांधकामामुळे पाणी पुरवठ्यासाठी बळ मिळेल. या दृष्टीने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. नदीपात्रात धरण व विहीर बांधकामाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्थायी प्रशासनाअभावी अडचणीआमगाव येथील नागरिकांच्या नगर परिषदेच्या मागणीची योग्य दखल घेवून शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा बहाल केला होता, परंतु नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रियेत नगरपंचायतचा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतचा कारभार सुरू झाला. मागील दीड वर्षापासून प्रशासकांचा कारभार होता. अस्थिर प्रशासनामुळे गावातील विकास कामे तसेच पाणी पुरवठा योजनेवरील कामे ठप्प पडली आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थायी प्रशासनासाठी व्यवस्था कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.