शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

आमगावकरांच्या घशाला पडली कोरड

By admin | Updated: March 26, 2016 01:41 IST

आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील ...

पाणी पुरवठा बंद : पर्यायी व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षआमगाव : आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील पर्यायी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून आमगावकरांच्या घशाला कोरड पडली आहे.आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता ही योजना कालबाह्य ठरली होती. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंज़ुर करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करताना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताकडे योग्य लक्ष देण्यात आले नाही. प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना घाईघाईने कार्यान्वित करुन घेतली. आमगाव येथे नदी पात्रातून असलेल्या सिंचन विहिरींच्या माध्यमाने साठवण करुन पाण्याची उपलब्धता करण्यात येत होती. या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने पाणी साठवणुकीसाठी नदीपात्रात मोठ््या धरणाची आवश्यकता आहे. पाणी साठवण करण्याकरिता नवीन विहिरींची गरज आहे. या मुलभूत बाबीकडे दुर्लक्ष झाले. उलट बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची पूर्तता भागविण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याच्या मागणीतील वाढ लक्षात घेता बनगाव प्रादेशिक पुरवठा योजनेतील पाणी, मागणीवरील खर्च भागत नसल्याने प्रशासकांनी पाणी पुरवठा बंद केला व पूर्ववत नदी पात्रातील साठवणुकीतील पाण्याने नागरिकांची तहानभागविण्यात आली. परंतु नदीपात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथे मागील चार दिवसांपासून खंडीत पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)नदीपात्रात धरण बांधकाम व्हावेनदीपात्रातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला सक्षम करण्यासाठी नदीपात्रात धरणाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील पाणी साठवणमुळे या भागात सिंचन वाढेल. तसेच नवीन विहीर बांधकामामुळे पाणी पुरवठ्यासाठी बळ मिळेल. या दृष्टीने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. नदीपात्रात धरण व विहीर बांधकामाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्थायी प्रशासनाअभावी अडचणीआमगाव येथील नागरिकांच्या नगर परिषदेच्या मागणीची योग्य दखल घेवून शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा बहाल केला होता, परंतु नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रियेत नगरपंचायतचा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतचा कारभार सुरू झाला. मागील दीड वर्षापासून प्रशासकांचा कारभार होता. अस्थिर प्रशासनामुळे गावातील विकास कामे तसेच पाणी पुरवठा योजनेवरील कामे ठप्प पडली आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थायी प्रशासनासाठी व्यवस्था कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.