शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कासा-किन्ही- कटंगटोलातील पुरग्रस्तांचा विषय भडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:39 IST

तालुक्यातील किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विषयाला घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी.....

ठळक मुद्देपुनर्वसन मंत्र्यांची विशेष बैठक : आ.अग्रवाल यांनी व्यक्त केली नाराजी

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यातील किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विषयाला घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व मंत्रालयातील संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी राज्य शासन व शासनातील अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा हा विषय पुरजोरपणे मांडला. त्यामुळे या विषय बैठकीत चांगलाच भडकला.बैठकीत आमदार अग्रवाल यांनी नामदार पाटील यांना राज्य शासनाने गोंदिया जिल्ह्याला लावारीस सोडल्याचे सांगत येथील जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदार आवश्यक कामांना पूर्ण करण्याप्रती उदासीन असल्याचे सांगीतले. ग्राम कासा व कटंगटोला येथे भूमी अधिग्रहण झाले असून मागील ८-१० वर्षांपासून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर ग्राम किन्ही येथे भूमी अधिग्रहणाचे काम करण्यास असमर्थ ठरत असल्याचे सांगीतले. तर सरकारही पुरग्रस्तांच्या पुनवर्सनाप्रती उदासीन असल्याचेही आमदार म्हणाले.त्याचप्रकारे, मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाऱ्यात सुमारे चार हजार नागरीकांना फटका बसला. तहसीलदारांनी तीन हजार ५०० लोकांची यादी शासनाला सादर केली. दिड वर्षे चक्कर मारल्यानंतर व शासनाने १० शासन निर्णय काढल्यानंतर २.७० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र ५०० नुकसानग्रस्त वंचीत असून त्यांच्यासाठी पुन्हा चक्कर माराव्या लागत असून गैरजबाबदार अधिकाºयांवर मात्र काहीच कारवाई झाली नाही. शिवाय त्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठीही काहीच कारवाई झाली नसल्याचेही आमदार अग्रवाल यांनी नामदार पाटील यांना सांगत आपली नाराजी व्यक्त केली.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीही नामदार पाटील यांच्यापुढे मांडत पाणी व चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली.अधिकाऱ्याना त्वरीत कारवाईचे निर्देशआमदार अग्रवाल यांची नाराजी ऐकून नामदार पाटील यांनी, उपस्थित अधिकाऱ्याना चांगलेच खडसावले. तसेच मदत व पुनर्वसन सचिव डॉ. मेघा गाडगीळ यांना पुर व नुकसानग्रस्तांच्या विषयांवर प्रस्ताव तयार करून शिफारसीसह मुख्यमंत्र्यांकडे अंतीम मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्याना दिले. दुष्काळात पाणी पुरवठा व चाºयाची कमी होऊन काही प्राणहानी झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल